जिथे मोदींची सभा होऊन सुद्धा गडी हरला नाही तिथे बाकीच्यांची काय मजाल?
चंद्रपूर :-
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा कांग्रेसचे आक्रमक नेते विजय वडेट्टीवार यांचा राजकीय प्रवास हा सर्वाना थक्क करून सोडणारा आहे, दरम्यान यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय वडेट्टीवार यांना पाडण्याची रणणिती जशी विरोधकांनी आखली होती तशी रणणिती स्वपक्षीय विरोधकांनी सुद्धा आखली होती, मात्र जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतांना व त्यांची सभा होऊन सुद्धा विजय वडेट्टीवार यांचा विजयी रथ कुणी रोखू शकले नाही तिथे बाकीच्यांची काय मजाल? जिथे विजय वडेट्टीवार तिथे विजय हा ठरलेलाच आहे असे राजकीय समीकरण असल्याने यावेळी झालेल्या चुरशीच्या लढतीत विजय वडेट्टीवार यांचा जवळपास 14 हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याने कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला, नव्हे या निवडणुकीत जिथे दिग्गज पराभूत झाले तिथे वडेट्टीवारांचा विजयी रथ कुणी रोखू शकले आणि स्वतःचं तोंडघशी पडले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
चंद्रपुरातील गोंडपंपरी तालुक्यातील करंजी या गावात सन 1962 साली जन्मलेल्या विजय वडेट्टीवारांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती अगदी महाविद्यालयीन दिवसांपासून. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आलेल्या विजय वडेट्टीवारांनी एनएयूआयच्या माध्यमातून विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. हा काळ 1980-81 चा होता. पुढे राजकीय वाटचालीत चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर असे जिल्हे त्यांच्या कारकीर्दीच्या केंद्रस्थानी राहिलेले दिसून येतात.
महाविद्यालयीन काळात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून आंदोलनं केली असली, तरी पुढे त्यांनी शिवसेनेच्या झेंडा खांद्यावर घेतला आणि चंद्रपूर जिल्ह्यात विविध आंदोलनं त्यांनी केली. 1991 ते 1993 दरम्यान ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे ते नामनियुक्त सदस्य बनले. पुढे राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार असताना, 1996 ते 1998 दरम्यान वडेट्टीवारांकडे महाराष्ट्र वन विकास महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं. या पदाला राज्यमंत्री दर्जा होता. वडेट्टीवारांच्या राजकीय कारकीर्दीतलं हे पहिलं राज्यव्यापी पद होय. 1998 साली त्यांना शिवसेनेनं विधानपरिषदेची आमदारकी दिली आणि पहिल्यांदा ते विधिमंडळाची पायरी चढले.
पुढे 2004 साली ते पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले. चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली आणि आमदार बनले. याच काळात म्हणजे 2005 साली शिवसेनेत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी बंड केलं. नारायण राणेंच्या समर्थनार्थ उभे राहिलेल्या 11 आमदारांमध्ये विजय वडेट्टीवार हेही होते. पुढे नारायण राणेंनी प्रवेश करताच काँग्रेसमध्ये महसूलमंत्री पद सांभाळलं. त्यांच्या समर्थकांमधील विजय वडेट्टीवारांना मंत्रिपदासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. 2008 साली विजय वडेट्टीवारांना जलसंपदा, आदिवासी विकास आणि पर्यावरण वने या खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं. मात्र, हे पद एकच वर्षे सांभाळता आलं. कारण वर्षभरात विधानसभा निवडणुका झाल्या आणि ते पुन्हा एकदा चिमूर मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर म्हणजे 2009 साली जलसंपदा, ऊर्जा, वित्त व नियोजन आणि संसदीय कार्य या खात्यांचं राज्यमंत्रिपद वडेट्टीवारांकडे आलं.
विजय वडेट्टीवार होणार कांग्रेस कमेटी चे राज्याचे अध्यक्ष?
2014 साली काँग्रेसची सत्ता गेली, मात्र वडेट्टीवार काँग्रेससोबतच राहिले. विधानसभेत त्यांच्याकडे उपनेतेपद आलं. पुढे राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेतेपदी असतानाच, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं, रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. वडेट्टीवारांची राजकीय कारकीर्द ही ही फारच संघर्षशील अशी आहे, विजय वडेट्टीवार हे उत्तम संघटक आहेत. शिवाय, आक्रमक नेते म्हणूनही ते ओळखले जातात. याच गुणांच्या नेत्याची सध्या काँग्रेसला गरज आहे. त्यामुळे वडेट्टीवारांचा काँग्रेस पक्षाला फायदा होऊ शकतो.
वडेट्टीवार आधी चिमूर आणि नंतर ब्रह्मपुरी मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलेत. मतदारसंघ बदलूनही त्यांनी विजयी होणं सोडलं नाही. किंबहुना, त्यांच्या मतदारसंघात नरेंद्र मोदींची सभा झाली, तरीही ते विजयी झाले. वडेट्टीवारांनी आपलं यश राखण्यातलं सातत्य दाखवून दिलंय. शिवाय, मंत्री म्हणून राज्यव्यापी मुद्द्यांवरही आवाज उठवलाय. त्यामुळेच त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं आणि आता जिथे विरोधी पक्ष संपवायला महायुती निघाली तिथे कांग्रेसला उभारनी देण्यासाठी कांग्रेस विजय वडेट्टीवार यांना पक्षाचं अध्यक्ष पद देऊन राज्याची धुरा देऊ शकतात अशी परिस्थिती आहे.