Home मुंबई लक्षवेधक :- कुणाला निष्ठा शिकायची असेल तर ती मनसे नेते बाळा नांदगावकर...

लक्षवेधक :- कुणाला निष्ठा शिकायची असेल तर ती मनसे नेते बाळा नांदगावकर यांचेकडून शिका.

एवढे पराजय बघितल्यानंतर सुद्धा राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं हे खऱ्या प्रेम व मैत्रीचं दर्शन.

मुंबई :-

देशात आणि राज्यात राजकारणाचा पूर्णतः चिखल झाला असल्याचे चित्र आहें, आज इथे उद्या तिथे असं सोईच राजकारणं करून कापड्यासारखे पक्ष बदलणारे नेते सर्वत्र दिसत दिसत आहें, पण महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळ सारख्या तत्कालीन बलाढ्य नेत्याला विधानसभा निवडणुकीत हरवून जॉईंट किल्लर म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली ते मनसे नेते बाळा नांदगावकर आज राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षाची कित्तेक निवडनुकामध्ये पराभव होतं असतांना सुद्धा सत्तेसाठी ते कुठल्या पक्षात न जाता एवढ्या पराभवानंतर सुद्धा एकनिष्ठ आहें हा आदर्श आज महाराष्ट्राच्या राजकारण्यापुढे त्यांनी ठेवला आहें, आज त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्ती आणि पक्षांप्रती निष्ठा ठेवणारा दिवस म्हणून पाळला जावा अशी आवश्यकता आहें असं म्हटलं तरी वावग ठरू नये.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांची राजनिष्ठा ही महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी ठरत आहें, कारण नांदगावकर यांना सत्ताधारी पक्षाच्या अनेक ऑफर आल्यानंतर सुद्धा त्यांनी हरणे पसंत केले पण पक्ष सोडला नाही, आजही महाराष्ट्रातील अनेक जुने मनसे कार्यकर्ते बाळा नांदगावकर यांचा आदर्श घेऊन पक्षात काम करत आहें, कुठलीही सत्ता नसताना अंगावर पोलीस केसेस घेऊन ते लढत आहें आणि आज ना उद्या या महाराष्ट्रात एकदा राजसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होतीलच हा आत्मविश्वास ठेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे, अशा या आदर्श नेत्यांचा आज वाढदिवस आहें, त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील युवा कार्यकर्त्यात जोश निर्माण होऊन मनसेचा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या सदनावर फडकवल्या जावो हीच मनोमन मनसे इच्छा आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांना वाढदिवसाच्या रेल्वेभरून शुभेच्छा.

मैत्री असावी तर बाळा-राज सारखी

असं म्हणतात की ज्याच्यावर जीव जडला तर आपण आपलं राहत नाही तर आपल्या मित्राला सर्व समर्पित होतं असतं अगदी अशीच स्थिती मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची आहें. जेंव्हा राजसाहेब ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेंव्हा त्यांच्या सोबत शिवसेनेचे अनेक आमदार खासदार बाहेर यायला तयार होते, पण आपल्या काकांनी स्वतःच्या बळावर पक्ष उभा केला तो तोडायचा नाही तर आपल्या हिंमतीवर पक्ष उभा करायचा निर्धार करून राजसाहेब ठाकरे यांनी मनसे पक्षाची स्थापना केली, दरम्यान मैत्रीचं अतूट नातं असलेले बाळा नांदगावकर हे मात्र फार अस्वस्थ होतं होते, कारण कुठंलाही नेता पाठीशी नसताना राजसाहेब एकटे काय करतील? हा प्रश्न नांदगावकर यांना चिंतातूर करत होता त्यामुळे त्यांनी हिंमत करून बाळासाहेब ठाकरे यांना भेटून अत्यंत गंभीर पणे आपले मत मांडले की साहेब, राजसाहेब एकटे आहें त्यांच्यासोबत कुणी नाही अशा स्थितीत मला त्यांच्या सोबत जाण्याची परवानगी द्या, त्यावर बाळासाहेबांनी सुद्धा दोन मित्रांच्या आड न येता बाळा तू जाऊ शकतो असे म्हणून परवानगी दिली आणि दोन मित्र पुन्हा एकत्र नव्या लढाई ला सज्ज झाले ते प्रेम आणि ती मैत्री आजही आबाधित आहें, याचा आदर्श सर्वांनी जपावा एवढं हे मैत्री भावाचा प्रेम आहें. त्यामुळे मैत्री असावी ती बाळा -राज सारखी असं म्हणावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here