वडेट्टीवारांना जेंव्हा मोदी लाट असतांना व पंतप्रधान मोदींची सभा झाली असतांना पाडू शकले नाही तिथे धानोरकर यांचे मनसुबे साकार होणार?
लक्षवेधी :-
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील लोकसभा निवडणूकी अगोदर सुरू झालेला वाद संपता संपत नसल्याचे दिसत आहे, दरम्यान प्रतिभा धानोरकर यांनी मागील रविवारी थेट विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात जाऊन अल्पसंख्यकांची सत्ता संपवा आणि पक्ष न पाहता कुणबी उमेदवार निवडून आणा असं आवाहन केल्याने विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील राजकीय संघर्षाचा पुन्हा एक नवीन अध्याय सुरु झाला असल्याचे स्पष्ट होतं आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी मतदार संघात जाऊन अल्पसंख्यकांची सत्ता संपवा, पक्ष न पाहता फक्त कुणबी उमेदवार निवडून आणा असं आवाहन चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी करून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जणू इशारा दिला आहे, वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी मतदारसंघात जवळपास 60 हजार कुणबी मतदार आहेत आणि हीच बाब लक्षात घेऊन धानोरकर यांनी वडेट्टीवारांना पराभूत करण्याचा ब्रम्हपुरी शहरात झालेल्या कुणबी महाअधिवेशनात अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचे बोलल्या जातं आहे.
काय वडेट्टीवार यांना पाडण्याची धानोरकर यांच्यात धमक आहे?
ज्यांना वारसाहक्काने मिळतं ना त्याची किंमत त्याला कळतं नसते पण ज्यांनी संघर्षातून मिळवलं असतें त्यांना त्याची किंमत कळतं असतें, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा राजकीय संघर्ष बघितला तर खासदार धानोरकर ह्या कुठल्या पासांगात बसत नाही एवढं मोठं कार्य त्यांचं आहे, जिथे आपलं स्वतःचं मतदान नाही अशा चिमूर विधानसभा क्षेत्रात निवडून आलेले विजय वडेट्टीवार आणि त्यांनंतर पक्षाने आदेश दिल्यानंतर ब्रम्हपुरी सारख्या नव्या विधानसभा मतदार संघातून सुद्धा निवडून येण्याची किमया जेंव्हा मोदी लाट असतांना ते साधतात ते पाहिजे तेवढं सोपं नाही, दरम्यान ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघात पंतप्रधान मोदींची सभा झाली असतांना सुद्धा त्यांना भाजप पाडू शकले नाही तिथे धानोरकर यांचे मनसुबे साकार होणार? असं कुणाला वाटत असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहे असे म्हणायला हरकत नाही आणि विजय वडेट्टीवार यांचा नाद केला तर कार्यक्रम करेक्ट करतात हा आजवरचा अनुभव बघता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांना डिवचवू नये तेच राजकीय आरोग्याला बरे होईल असं राजकीय तज्ञाचं मत आहे.
वस्तुस्थित काय आहे?
राज्यात लोकसभा निवडणूकीपूर्वी मोदी विरोधात लाट होती आणि त्यामुळेच महाविकास आघाडी उमेदवारांना त्याचा फायदा मिळाला, दरम्यान विदर्भात भाजप चा बोलबाला असतांना कांग्रेसने जास्तीत जास्त जागा जिंकल्या ही वस्तुस्थिती आहे. परंतु कांग्रेस च्या प्रतिभा धानोरकर लोकसभेत निवडून आल्या त्या त्यांच्या कर्तृत्वाने किंव्हा त्यांच्याप्रती असलेल्या सहानुभूतीमुळे निवडून आल्या नाही तर भाजप विरोध मतदान त्यांना मोठ्या प्रमाणात मिळालं आणि मोदी पुन्हा सत्तेत आले तर संविधान धोक्यात येईल या प्रचाराने एस्सी एसटी व अल्पसंख्यांक समाजाने कांग्रेस चा उमेदवार कोण आहे याचा कुठलाही विचार न करता कांग्रेस उमेदवाराला मतदान केलं त्यामुळे 2 लाख 60 हजार पेक्षा जास्त फरकाने धानोरकर निवडून आल्या ही वस्तुस्थिती आहे, पण असं म्हटल्या जातं की जीता वही सिकंदर बाकी सब बंदर, त्यामुळे स्वतःचं असं कुठंलाही मोठं कार्य नसताना व प्रतिस्पर्धी उमेदवार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या एवढी राजकीय सामाजिक उंची नसताना केवळ कांग्रेस उमेदवार म्हणून त्यांना मतदारांनी निवडून दिलं पण जणू आपणचं विजयाचे खरे हक्कदार आहोत या बालिशपणात खासदार प्रतिभा धानोरकर यांची सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी होतं असलेली विधान ही खऱ्या अर्थानं त्या कांग्रेस कार्यकर्ते व कांग्रेस ला मतदान करणाऱ्या मतदारांवर विपरीत परिणाम करणारी ठरत आहे.
“गरज सरो वैद्य मरो” अशी खासदार धानोरकर यांची भूमिका?
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना कांग्रेस पक्षात आणून त्यांना कांग्रेस कडून उमेदवारी मिळावी म्हणून ज्यांनी जीवाची बाजी लावली ते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार त्यावेळी बाळू धानोरकर यांच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत सत्ताधारी भाजप विरोधात लढले, मोदी लाट असतांना सुद्धा कांग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याची प्लॅनींग विजय वडेट्टीवार यांनी केली आणि बाळू धानोरकर निवडून आले, पण त्यानंतर मात्र खासदार बाळू धानोरकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्यासोबतच पंगा घेतला, त्यांना सुद्धा असं वाटतं होतं की मी म्हणजे सर्वकाही, त्यातच जेष्ठ नेते दिवंगत मोरेश्वर टेमुर्डे यांनी कांग्रेस च्या अंतर्गत राजकारणात लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारी संदर्भात जो गोंधळ सुरू होता त्यावेळी स्वतः त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या माध्यमातून बाळू धानोरकर यांना उमेदवारी मिळवून दिली त्या दिवंगत मोरेश्वर टेमुर्डे यांना सुद्धा बाळू धानोरकर यांनी खालच्या भाषेत बोचरी टिका करून अपमानित केलं म्हणजे धानोरकर परिवाराचं “गरज सरो वैद्य मरो” असं नवं धोरण सुरु आहे का? असा प्रश्न पडतो. त्यातच आता खासदार प्रतिभा धानोरकर यांना एस्सी, एसटी, अल्पसंख्यांक समाजाने एकतर्फी मतदान करून निवडून दिलं आता त्यांना सुद्धा त्याचा विसर पडला असून मला कुणबी समाजाने निवडून दिल्याचं त्या सांगतात म्हणजे त्यांचं राजकीय गणित किती कच्च आहे हे प्रतीत होतं आहे.