अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- स्वातंत्र्य दिनानिमित्त जनता महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली. महाविद्यालयाचे सचिव डॉ.अशोकभाऊ जीवतोडे व प्राचार्य डॉ.एम.सुभाष यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्ती जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाप्रती भक्ती व्यक्त करणे हा या रॅलीचा उद्देश होता.
रॅलीत महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत घरोघरी तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा मुख्य उद्देश होता.
जनता महाविद्यालयापासून निघालेली रॅली गजानन मंदिर चौकातून मार्गस्थ होऊन पुन्हा महाविद्यालयात आली. रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांनी विद्यार्थ्यांना झेंडे वाटून घरोघरी झेंडे लावण्याचे आवाहन केले. देशभक्तीपर गीते व घोषणांनी रॅलीचा समारोप झाला.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.अमर बल्की, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.गणेश येरगुडे, नॅशनल कॅडेट कॉर्प्सचे प्रमुख प्रा.प्रशांत बल्की, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.किशोर ठाकरे, आदींच्या परिश्रमाने रॅली यशस्वी झाली. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी.”