डिएनआर ट्रॅव्हल्स च्या मुजोरीने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत, तरीही प्रशासन गप्प का? जनतेचा संताप.
चंद्रपूर:-
दररोज शहरात डिएनआर, महाकाली, पर्पल, बागडी आणि गणराज ट्रॅव्हल्स च्या गाड्या शहरात केवळ प्रवाशी घेऊनच येत नाही तर त्यात राज्यातील अनेक शहरातून पार्सल घेऊन येतात, त्या पार्सल मध्ये नेमकं काय आहें याचा कुठंही उल्लेख नसतो त्यामुळे ही पार्सल सेवा एक प्रकारचा पैशाचा हवाला यासंह अफिम,गांजा, ब्राऊन शुगर व बंदूक सारखे शस्त्र पुरवठा करण्याचा स्रोत असल्याची चर्चा शहरात असून यामध्ये डिएनआर ट्रॅव्हल्स द्वारे दररोज मोठी उलाढाल होत असल्याने यावर अंकुश लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांनी स्थानिक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांना निवेदन देऊन या अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्या डिएनआर ट्रॅव्हल्स संचालकांवर कारवाई करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता, दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालयाने डिएनआर ट्रॅव्हल्स संचालकांवर लाखों रुपयांचा दंड थोपटला असल्याची माहिती असून वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे नोटीस देऊन रस्त्यावर पोहचलेला डिएनआर ट्रॅव्हल्स चा पार्सल चा धंदा बंद करण्याचे आदेश दिले आहें, मात्र डिएनआर ट्रॅव्हल्सचे संचालकांनी मुजोरी करून रस्त्यावर अतिक्रमण सुरुचं ठेवल्याने डिएनआर ट्रॅव्हल्स चा संचालक हे जिल्हा प्रशासनाचे जावई आहेंत का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत एका न्यूज चैनेल च्या प्रतिनिधिनी जिल्हाधिकारी यांना विचारला, दरम्यान आता तो खरा आहें असेच वाटायला लागले आहें. कारण डिएनआर संचालकांवर दंड आकारणी करून सुद्धा ते ऐकत नसेल तर निश्चितच प्रशासनाची त्यांना मुकसंमती असेल, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना डिएनआर ट्रॅव्हल्सच्या अवैध पार्सल व वाहतूकी विरोधात लवकरच मनसे स्टाईल आंदोलन करणार अशी माहिती समोर आली आहें.
राज्य परिवहन विभागाचा आदेश आहें की बस स्थानक यापासून खाजगी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स अथवा टॅक्सी यांचे अंतर किमान 200 मिटर असावे व शहरात याची वाहतूक करण्यात येऊ नये, दरम्यान सन 2016 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी शहरातील जेवढे पण ट्रॅव्हल्स आहें त्या सर्वाना शहरा बाहेर हाकलले होते व शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती पण आता स्वतः जिल्हाधिकारी ज्या मार्गाने कार्यालयात येतात त्या मार्गांवर भररस्त्यात डिएनआर ट्रॅव्हल्स चे पार्सल साहित्य पडून दिसत असतांना सुद्धा जिल्हाधिकारी याबाबत कारवाई का करत नाही हा गंभीर प्रश्न असून जिल्हाधिकारी यांच्या पत्रकार परिषदेत स्वतः एका न्यूज चैनेल च्या पत्रकाराने जिल्हाधिकारी यांना प्रश्न विचारला होता की आपल्या येण्याजण्याच्या मार्गांवर आपल्याला डिएनआर ट्रॅव्हल्सच्या पार्सल सामान रस्त्यावर दिसत असतें व गाड्या रस्त्यावर उभ्या असतात त्यावर प्रतिबंध का घातला जातं नाही, डिएनआर जिल्हा प्रशासनाचे जावई आहे का असा उपरोधीक प्रश्न विचारला होता, त्यामुळे आरटीओ कार्यालयाने दंड आकारला असल्याची माहिती आहें, पण तरीही डिएनआर संचालकांनी आपली मुजोरी कायम ठेवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आता अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असून शहरातील जनता सुद्धा यामध्ये सहभागी होईल अशी शक्यता वाढली आहें
डिएनआर ट्रॅव्हल्स संचालक म्हणतात….पत्रकारांना फाट्यावर मोजतो?
पैशाची गुर्मी भल्याभल्यांना माज निर्माण करत असून त्यांना समोरचे व्यक्ती हे फार छोटे व चिल्लर वाटतात, दरम्यान डिएनआर ट्रॅव्हल्स संचालक यांचे म्हणणे आहें की माझ्याकडे जे वृत्तपत्र येते त्यांनाच मी वर्षाला जाहिरात देतं असतो व काही माझे मित्र आहें त्या पत्रकारांना दिवाळीची भेट वस्तू देतो आणि बाकीच्यांना मी फाट्यावर मोजतो, दरम्यान मला कुणी पैसे मागायला आले की मी त्यांची झाडाझडती घेतो, मी अगोदरचं कुणाला पैसे देतं नाही पण माझ्याकडे कुणी बातमी संदर्भात माझ्या विरोधात पत्रकारांनी कुठल्या बाबतीत फोन केला तर मी त्यांना सुनावतो, असे अनेक पत्रकारांना मी सुनावले आहें. दरम्यान त्यांनी असे सुद्धा म्हटले आहें की महिन्याला आम्हांला सगळीकडे पैसे द्यावे लागतात त्यामुळे मी कुण्या पत्रकार व राजकीय लोकांना पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण प्रशासनातील अधिकाऱ्यांना पैसे देऊन डिएनआर ट्रॅव्हल्स संचालक मनमानी पद्धतीने रस्त्यावर अतिक्रमन करून रहदारीला अडथळा निर्माण करतेय आणि खुद्द जिल्हा प्रशासन याकडे डोळेझाक करत असेल तर ही भयंकर गंभीर बाब आहें, दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे आंदोलन झाल्यानंतरच प्रशासन जागे होईल का? हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहें.