Home गंभीर दुर्दैवी :- समुद्रपूर तालुक्यात वासी येथील शेतात एका शेतकऱ्याचा करंट लागून मृत्यू.

दुर्दैवी :- समुद्रपूर तालुक्यात वासी येथील शेतात एका शेतकऱ्याचा करंट लागून मृत्यू.

शुभम चावरे या गरीब शेतकऱ्याचा दूर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ, शासनाची मदत मिळणार का याकडे लक्ष.

समुद्रपूर :-

तालुक्यातील उमरी (फोफळे) येथे राहणाऱ्या बंडू चावरे यांचा मुलगा शुभम चावरे यांनी मौजा कोरा येथील दिपक पाटिल यांची मौजा उमरी शिवारातील अंदाजे अडीच एकर शेत मक्त्याने केली होती त्या शेतात त्याने या वर्षी पराटी चे पिक घेतलेले होते, त्या शेताला लागुनच मौजा वाशी येथील अजय पाटिल यांचे शेत असुन त्यांचे शेतात सुद्धा पराटीचे पिक आहे. अजय पाटिल यांचे शेता मधुन असलेल्या पायवटिच्या रस्त्याने ईतर शेतकरी व शुभम चावरे हा नेहमी त्याने मक्तयाने केलेल्या शेतात पिकाची पाहणी तसेच कामा करीता जाणे-येणे करीत होता. तसेच तो दररोज सायंकाळी शेतात जावुन पिकाचे संरक्षणाकरीता पंपावरील ओरडण्याचे भोंगाडणे लावण्या करीता जात होता व काही वेळात घरी परत येत होता. मात्र दिनांक 2 डिसेंबर ला सायंकाळी तो शेतात गेला पण घरी आलाच नाही त्यामुळे त्यांचे काका गुरूदास चावरे यांनी शेतात जाऊन बघितले असता शुभम हा अजय पाटिल रा. वाशी याचे मौजा उमरी शिवारातील शेतातील तुर-पराटीचे पिकात लावुन असलेल्या ताराचे कुंपनावर उबड्या स्थीतीत पडुन दिसला असता पोलिसांना खबर देऊन त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले,

या प्रकरणी ज्यांच्या शेतात करंटची तार लावल्या गेली त्या शेतमालक अजय पाटील यांच्यावर गिरड येथील पोलीस स्टेशनं मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतात कुणीही इलेक्ट्रिक तारेने करंट लावून ठेऊ नये कारण यामुळे निरापराध शेतकऱ्यांचा जीव जाऊ शकते दरम्यान करंट लागून मृत पावलेल्या शुभम चावरे यांच्या परिवाराला आकस्मिक मृत्यू प्रकरणी सरकार तर्फे मदत मिळावी अशी मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here