भारतात केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजप सरकार विरोधकांना याचं EVM च्या माध्यमातून हरवतंय व जनतेला मुर्खात काढतंय हे स्पष्ट.
न्यूज इंटरनेट :-
भारतात भाजप सरकार हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भरोशावर निवडणूक जिंकत असून त्यात EVM मशीन मध्ये हेराफेरी करून सत्ता स्थापित करताहेत अशी बोंब भाजप सोडून सर्वच राजकीय पक्ष मारत आहें, कारण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात असतांना त्यांनी स्वतः या EVM मशीन वर आक्षेप घेतला होता आणि त्यानी सांगितले होते की जगातील अमेरिका जपान सारखे प्रगत देश बायलट पेपर वर निवडनुका घेतात तर भारतात EVM मशीन वर निवडणूक का? पण सत्ता आल्यावर तेच EVM कसे चांगले आहें हे दाखविण्याचा प्रयत्न करताहेत कारण त्यांना त्यातून सत्ता मिळतं आहें, पण अमेरिका इंटेलिजन्सच्या दाव्यानं जगभरात खळबळउडाली असून अमेरिकन इंटेलिजन्सच्या दाव्यानुसार EVM’ हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवणे शक्य आहें, त्यामुळे आता भारतातील EVM हैक केल्या जाते व त्यातून निकाल फिरवीला जातो हे आता स्पष्ट झालं आहें, त्यामुळे भारतातील सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी एकजूट करून EVM च्या माध्यमातून निकाल फिरवून लोकशाहीची एक प्रकारे हत्त्या करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोग व केंद्रातील भाजप सरकार यांच्या विरोधात जागतिक न्यायालयात अपील करणं आवश्यक झालं आहें.
देशात झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय आहें तो म्हणजे, ईलेक्ट्राॅनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आलेल्या अनपेक्षित निकालानंतर विरोधकांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. विशेष करून काँग्रेस सुरुवातीपासून ईव्हीएमचा निकाल मान्य नाही असे म्हणत आली मात्र आता अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सने ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करताना, ईव्हीएम हॅक करून निकाल बदलणे शक्य आहे, असा दावा केला आहे. या दाव्यामुळे भारतातील विरोधकांच्या ईव्हीएम विरोधाला भविष्यात आणखी धार चढण्याची शक्यता आहे.
काय आहें EVM संदर्भातील दावा?
अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सनच्या तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम (EVM) मशीन सहजपणे हॅक करून निवडणुकीच्या निकालात घोटाळा केला जाऊ शकतो, असा दावा केला आहे. यामुळे संपूर्ण अमेरिकेत मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया लागू करण्याची गरज व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थित तुलसी गबार्ड यांनी मत व्यक्त केल्याने ईव्हीएमच्या विश्वासर्हतेविषयी पुन्हा जगभरात चर्चा सुरू झाली आहे.
अमेरिकन दाव्याचे परिणाम काय?
अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सनच्या तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम मशीनविषयी उपस्थित केलेली शंका, त्यावरील मत समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होऊ लागलं आहे. त्याचे जगभरात पडसाद उमटू लागले आहे. विशेष म्हणजे, तुलसी गबार्ड यांना समाज माध्यमातून पाठिंबा देखील वाढू लागला आहे. परंतु काहींनी तुलसी गबार्ड यांच्या शंकेमागे राजकीय अजेंडा असल्याची भावना व्यक्त केली आहे. टेस्लाचे सीईओ इलाॅन मस्क यांनी देखील गेल्या वर्षी इलेक्ट्राॅनिक्स मतदान यंत्रावर (EVM) प्रश्न उपस्थित केले होते.
भारतीय निवडणूक आयोगाचा दावा बोगस?
अमेरिकेच्या तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या दाव्याचे पडसाद भारतात देखील उमटू लागले आहेत. यावर भारतीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत मतदानात पाच कोटींहून अधिक व्हीव्हीपॅटवरील मतांशी जुळणी झाली आहे. ईव्हीएम मतांशी जुळत आहे. हा ईव्हीएमबाबतच्या विश्वासर्हतेचा सर्वात मोठा पुरावा आहें असे म्हटले आहें, पण भारतीय निवडणूक आयोग निवडणूकीतील सर्व व्हीव्हीपॅटवरील मतांची गिनती करायला तयार नाही व नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीत याचं निवडणूक आयोगाने 45 लाखापेक्षा जास्त मतदान अतिरिक्त झाल्यानंतर लपाछपी केली आहें, जो उमेदवार स्वतःच्या गावात मोठ्या प्रमाणात मतदान असतांना तिथे त्याला मतदान मिळतं नाही, एवढंच काय ज्या बूथवर चक्क उमेदवार यांचे स्वतःचे मतदान EVM मधून गायब होतात हे अनेकदा झालं आहें त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग अमेरिकन दाव्याच्या धर्तीवर जो दावा करत आहें तो बोगस आहें हे आता स्पष्ट होत आहें.कारण भारतात केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजप सरकार याचं EVM च्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना हरवतंय आणि जनतेला मूर्ख बनवतंय.