लोकमान्य विद्यालय भद्रावतीच्या 1994 वर्षाच्या शैक्षणिक सत्रात 10 वी झालेले विद्यार्थी जुन्या पण गोड आठवणीत रंगले…
भद्रावती:-
जीवनाच्या शाळेत माणूस नेहमी विद्यार्थिच असतो, कारण तो सतत शिकतच असतो, पण तब्बल 31 वर्षानंतर ज्या शाळेत आपण शिकलो त्या सर्व विद्यार्थ्यांचं स्नेहमिलन झालं तर कित्ती ते अविस्मरनीय असेल याची कल्पनाचं अंगावर शहारे आणणारी ठरेलं, अशाच एका शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा रविवार दिनांक १५/०६/२०२५ ला मुरलीधर पाटील गुंडावार लॉन सब्जी मार्केट, भद्रावती येथे संपन्न झाला, लोकमान्य विद्यालय भद्रावतीच्या 1994 वर्षाच्या शैक्षणिक सत्रात 10 वी झालेले विद्यार्थी जुन्या शाळेतील त्या आठवणीत एवढे रंगले की जणू ते आत्ताही त्या शाळेच्या स्नेहमिलन सोहळ्यात सहभागी झाले असावे, पण 31 वर्षाचा प्रदीर्घ काळ आणि त्यानंतर सर्वांच्या झालेल्या भेटी ह्या निश्चितच मनाला जुन्या शाळेच्या त्या आठवणीला उजाळा देतं होत्या, ते एकत्र बसून खाल्लेले डबे, निकालाच्या दिवसांची भीती, बोर्डाच्या परीक्षा, हातावर खाल्लेल्या छड्या, मैदानावर खेळलेले खो-खो, कबड्डी चे डाव, मन पिळवटून टाकणारा तो शेवटचा दिवस आणि आता उरलेल्या त्या गोड आठवणी…. ह्या साऱ्याच सर्व विद्यार्थ्यांच्या मानसपटलावर थैयाथैया नाचत होत्या आणि एकमेकांसोबत त्या आठवणी शेअर करत प्रत्येक जन त्या शाळेकरी मुलांच्या भूमिकेत स्वतःला समजत होते, दरम्यान आपल्यामधील कला गुणांना वाव देतं आपण मिळविलेली उपलब्धी आणि आत्ताचा व्यवसाय एकमेकांना आस्थेने विचारत होते.
आत्ताच्या शिक्षणात आणि विस-तीस वर्षांपूर्वीच्या शिक्षणात अमूलाग्र बदल झाला आहें, कारण त्यावेळी मोबाईल नव्हते, नोट्स सुद्धा उपलब्ध नव्हते आणि ट्युशनचं पण टेन्शन नव्हतं, मात्र शाळेत वेळेवर जायचं कारण मस्तरांचा धाक होता, होमवर्क करून आले नाही तर छडी छमछम करत हातावर नाचविल्या जातं होती, जणू आपण फार मोठे गुन्हेगार आहोत याची जाणीव होत होती, पण आताच्या काळात शिक्षणाचं बाजारीकरण झालं आणि ट्युशन च्या नादात विद्यार्थ्यांचा आपसातील संवाद संपला, बालवयातच अभ्यासाचं एवढं ओझं झालंय की कुणाला कुणाकडे बघण्याची सुद्धा उसंत मिळत नाही एवढं दफ्तर मोठं झालंय, पण हीच गोस्ट 30 वर्षांपूर्वीची कशी होती याची साधी कथा सुद्धा कुणी सांगितली की तेंव्हा शिकणाऱ्या आजच्या प्रौढ व्यक्तीला जुन्या त्या शाळेत पुन्हा जावंस वाटेल एवढं ते शिक्षण अविस्मरनीय होतं असा आभास सर्वाना होतं असतो.
*काय काय होतं कार्यक्रमाचं नियोजन*
लोकमान्य विद्यालय भद्रावतीच्या 1994 वर्षाच्या शैक्षणिक सत्रात 10 वी झालेले भद्रावतीच्या काही विद्यार्थ्यांनी मनात ठाणलं की आपण आपल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा आयोजित करायचा आणि चक्क कार्यक्रमाची पत्रिकाचं ठरली, त्यात कार्यक्रमाची रुपरेषा होती, सकाळी ९ ते १० अल्पोपहार करायचा, १० ते ११ लोकमान्य शाळेला भेटद्यायची ११ ते ०१ जुन्या शिक्षकांचा सत्कार करायचा, दुपारी १ ते ०२ सहभोजन करायचं, २ ते ३ विद्यार्थी परिचयदेणारं, ३ ते ४ मनोरंजन कार्यक्रम ज्यामध्ये कुणी गाणे म्हणणार तर कुणी चुटूकले ऐकवणार, ४ ते ५ ला विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करणार, ५ ते ५.३० परत अल्पोपहार आणि सायं- ५.३० ते ६ आभार प्रदर्शन असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला तो त्या पद्धतीन संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदू पढाल यांनी केले तर सूत्र संचालन डॉ. राहुल घिवे, अजय पाटील व स्वाती गुंडावार यांनी केले, अभार प्रदर्शन पंकज भास्करवार यांनी केले, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भारती ताठे, फिरोज पठाण, गोपाल गायकवाड, शैलेश कोठारी, शैलेश बावणे ,अतुल कथाने यांनी परिश्रम घेतले.
कोण होते ते 31 वर्षानंतर स्नेहमिलन सोहळ्यात मिळालेले भाग्यवान विद्यार्थी?
गेली कित्तेक वर्ष कुणी कुणाला भेटलं नसेल पण स्नेहमिलन सोहळ्यात जे विद्यार्थी एकमेकांना अगदी आतुरतेने भेटले ते सर्व आहेत अमन मारेकर, नित्यानंद ठेंगणे, मारोती चवरे, घनश्याम नांदेकर, छोटू नळे, फिरोज पठाण, वैभव सोनुकले, पवन कोमरेडडीवार, गोपाल गायकवाड, रवि हनुमंते, नागेश पुनवटकर, राहुल कथडे, अतुल कठाने, संदीप खारीकर, शैलेश बावणे, नरेश भुसारी, यशवंत कुतरमारे, सतीश ठमके, समीर शेख, नरेंद्र साने, बाबा आस्वले, मनोहर घोडमारे भैयाजी पारखी, राहुल घिवे, अशीम बिस्वास, संदीप ठेंगणे, दिनेश बुराण, हनुमान गोवरदिपे, प्रशांत रठ्ठे, माधुरी बावणे, मंजू नळे, कुंदा पाटील, ममता बलकी, भारती गुंडावार, स्वाती गुंडावार, भारती ताठे, योगिता सातपुते, तृप्ती पारधे संजय मते, प्रशांत चहांदे, अनुप न्याहारे, अजय पाटील, दिनेश हनुमंते, भास्कर बोंडे, सुरेश गेडाम, पंकज पांढरे, किरण मांदाडे, सारिका भट्टलवार, वैशाली देठे, जयश्री झाडे, मंजुषा खनके, रंजना लालसरे, ज्योती टाले, आनंद गळगटे, मालू टोंगे, रंजना मुडे, देवयानी रामटेके. कल्याणी पांडिले. वैशाली उपरे, मंजुषा काकडे. राधा साठेइत्यादीची उपस्थिती होती.
31 वर्षांपूर्वी शिकविणाऱ्या शिक्षकांचा पण झाला सत्कार.
ज्या शिक्षकांनी हातावर छड्या दिल्या, भविष्याची स्वप्ने दाखवली व ते स्वप्न पूर्ण करण्याची ऊर्जा दिली त्या गुरुवर्यांचा सत्कार विद्यार्थ्याच्या स्नेहमिलन सोहळ्यात झाला नाही तर नवलंच तर त्या शिक्षकांमध्ये दरेकर सर, चिडे सर, जांभुळे सर, ठेंगणे सर, पारधे सर, रावळे सर, भास्करवार सर, सरपटवार सर, पबीतवार मॅडम, पाटील सर या शिक्षकाचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, महत्वाची बाब म्हणजे या सन 1994 च्या दहावी बैचकडून शाळेला 2 सिलिंग फॅन भेट म्हणून देण्यात आले