आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड सहिता, साथरोग कायदा व इतर संबंधीत कायद्यानुसार होणार कारवाई.
चंद्रपूर दि. 22 :-
कोरोना संकट अजूनही टळले नसून नव्याने पुन्हा कोरोना संक्रमणाची भीती बघता महाराष्ट्र राज्य शासनाने कठोर पाऊले उचललेले आहेत त्या द्रुष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालीका हद्दीत नागरिकांना रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपावेतो मुक्त संचार करण्यास राज्य शासनाचे निर्देशानुसार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मनाई आदेश काढला आहे. सदर आदेश दिनांक 22 डिसेंबर 2020 पासून 5 जानेवारी 2021 या कालावधीसाठी लागू राहील.
वैद्यकीय व आपातकालीन सेवोतील तसेच कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र हा आदेश लागू राहणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड सहिता, साथरोग कायदा व इतर संबंधीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.