शेतकरी भयभीत, पूजने, तुरीचे नुकसान
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:- तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकासह ईतरही पिकांचे मोठे नुकसान झाल्याने यंदाच्या खरीप हंगामातही शेतकरी राजा भयभीत झाला असून पुन्हा एकदा दुष्काळाचा अंदाज वर्तविल्या जात आहे. शेतात असलेले पुंजने, सड्यांसह तुरीचे आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे मत शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. यंदा खरीपाचे मोठे नुकसान होत आहे. नेहमीची ही परिस्थिती यंदाच्या हंगामा दरम्यान शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडण्यासारखी असून ओल्या दुष्काळाची शक्यता वर्तविली जात आहे. यंदाचा खरीप हंगाम उशिरा सुरू झाला असताना शेतकऱ्यांनी कोणतीही पर्वा न करता धानपिकाची रोवनी केली. उशिरा येणारा पाऊस उशिरा पर्यंत साथ देईल, अशी आशा होती. मात्र पावसाने दाड़ी मारली व परिणामी गोसे अंतर्गत ब्रिटिश कालीन आसोलामेंढा तलावाच्या माध्यमातून धानपिकाची रोवनी संपली. धानपिक उभे झाले, मात्र सततच्या दमट वातावरणामुळे धानपिकावर रोगाचे सावट परिणामी शेताच्या बांधावर टाकलेले धानपिकाचे पुंजने पाण्याने खराब होऊ नये म्हणून अनेक
शेतकऱ्यांनी पुंजन्याच्या सुरक्षेसाठी पालीथिन, त्रिफाल्ला आदिच्या उपयोग केल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे यंदाचा साधलेला खरीपाचा हंगाम अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा दुष्काळाची परिस्थिती निर्माण करणारा ठरत असल्याने शेतकरी राजा चिंतातूर झाल्याचे दिसून येत आहे.
निर्माण झाले. अनेक महागाडी किटक नाशके फवारुन सुद्धा रोगावर नियंत्रण करणे कठिन झाले. धानाची गर्भावस्था पासून सातत्याने रोगाचा प्रादुर्भाव कायम होता. परिणामी धानपिक कापनीला आणि हाती आल्यानंतर नेहमी प्रमाणे अवकाळी पावसाने सुरुवात केली. आजच्या घडिला शेतकऱ्याच्या धनपिकाची कापनी झाली. सर्झा बाँधावर व पुंजने उभे असताना पावसाने सुरुवात केल्याने यंदाच्या खरीप हंगामातही शेतकऱ्याचे मोठे नुक़सान
होताना दिसते आहे. अवकाळी पावसाने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या धानपिकाची नुकसान लक्षात घेता त्याचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दमट वातावर्णामुळे पावसाचा अंदाज पुढेही वर्तविल्या जात असून अवकाळी पावसामुळे पुंजने, सर्द्धा (अडाळशा), तूर, पराटी आदि पिकांची मोठी नुकसान