वेळोवेळी आंदोलन उपोषण करून सुद्धा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी बारमाही पाणी मिळतं नसल्याने आत्महत्त्या करण्याचा घेतला निर्णय.
न्यूज नेटवर्क :–
राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती व कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे, तर दुसरीकडे निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याचे जाहीर आश्वासन देणारे फडणवीस सरकार आता कर्जमाफीचा “म” म्हणायला तयार नाही, या सरकारला उद्योगपतींची कर्जमाफी करायला 15 लाख कोटी आहेत पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला 20 हजार कोटी नाही, उद्योगपतींच्या कारखान्यांना जलसंधारण विभाग पाणी देतंय पण शेतकऱ्यांना पाणी द्यायला त्यांच्याकडे पाणी नाही, त्यामुळे या लबाड सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे बळी जातं आहें, ते गळ्याला फास आवरत आहें, पण
कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळचा तरुण शेतकरी कैलास नागरे ज्यांना महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार देऊन सत्कार केला त्यांनाच भाजपा सरकारच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्त्या करावी लागली. त्यामुळं कैलास नारगेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असल्याने हा सरकारने घेतलेला बळी आहे. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होतं आहें.
महाराष्ट्र शासनाचा 2020 सालचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास अर्जुनराव नागरे यांनी शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून सुरू केलेला लढा अखेर आपल्या प्राणांची आहुती देऊन संपवला. शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याने, जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवणी आरमाळ गावातील आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी बारमाही पाणी मिळावे, यासाठी कैलास नागरे यांनी सातत्याने शासनाकडे मागणी केली होती. डिसेंबर महिन्यात त्यांनी सात दिवस अन्नत्याग आमरण उपोषण केले होते. त्यानंतर प्रशासनाने आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. शासनाने वेळोवेळी दिलेली आश्वासने फसवी ठरल्याने 26 जानेवारी रोजी ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार होते, मात्र पालकमंत्र्यांच्या आश्वासनावर त्यांनी हे उपोषण स्थगित केले. त्यानंतर दोन महिने उलटूनही ठोस निर्णय न झाल्यामुळे 13 मार्च 2025 रोजी त्यांनी आत्महत्या केली.
कैलास नागरे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काय?
शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत कैलास नागरे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठित लिहून ठेवलं की “शेतीसाठी सर्व सुविधा असूनही पाणी मिळत नाही. प्रशासन आणि शासनाने फसवणूक केली. माझ्या मृत्यूनंतर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यास माझे बलिदान सार्थक ठरेल.’
युवा शेतकऱ्यांची काय होती मागणी ?
राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याला होळीच्या सणाच्या दिवशी विषारी औषध पिऊन जीवन संपवावे लागले ही महाराष्ट्राला लाज आणणारी बाब आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे पण त्याच्या ताटातच अन्न नसेल तर तो आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरेल. कैलास नागरे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानाची नोट लिहून शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला आहे. कैलाश नागरे यांनी खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून शेतक-यांना पाणी द्यावे म्हणून डिसेंबर महिन्यात सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते पण तीन महिने उलटूनही पाणी मिळत नसल्याने नागरे निराश झाले होते व त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
हे कसले शासनकर्ते, शेतकऱ्यांचे बळी घेणारे?
एक ट्रिलीयनची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या सरकारला आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला पाणीसुद्धा उपलब्ध करुन देता येत नाही हे अत्यंत लाजीरवाणे व वेदनादायी आहे. एक तरुण शेतकरी आपले आयुष्य संपवतो याहून दुसरे दुर्दैव काय, पण सत्तेत बसलेल्यांना फक्त हिंदू, मुस्लीम, औरंगजेब याच्यापलीकडे काही दिसतच नाही. हे सरकार मुर्दाड आहे, मुजोर आहे क्रूरकर्मा औरंजेबापेक्षा निष्ठूर आहे, या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
कैलास नारगे या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येने सरकारने खडबडून जागे व्हायला हवे, पण तसे होताना दिसत नाही. कैलास नागरेची आत्महत्या ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला शमरेने मान खाली घालायला लावणारी आहे. सरकारमध्ये थोडीफार लाज शरम शिल्लक असेल तर त्यांनी कैलास नागरे यांच्या आत्महत्येला जबाबदार अधिका-यांवर कठोर कारवाई करून नागरे यांच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होतं आहें.