Home चंद्रपूर दखलपात्र :- सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीच्या एसआयटी चौकशी मागे काय आहें गुपित?

दखलपात्र :- सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीच्या एसआयटी चौकशी मागे काय आहें गुपित?

चंद्रपूरच्या प्रसारमाध्यमात आंदोलन उभे करणाऱ्या असली कर्णधारांचे नाव कां करतात गायब? ही कसली पत्रकारिता?

चंद्रपूर :-

सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीची एसआयटी चौकशी सुरु झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रसारमाध्यमामध्ये ज्या बातम्या प्रकाशित आणि प्रसारित होतं आहें, त्यामध्ये सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरती विरोधात सतत पाठपुरावा करून आंदोलन उभे करणाऱ्या राजू कुकडे यांचे नाव मात्र आकसापोटी परस्पर डावलल्या जातं आहें, खरं तर राजू कुकडे यांनी आंदोलन सुरु केले म्हणून बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी चंद्रपूर न्यायालयात आणि मूल येथील न्यायालयात अब्रूनुकसान व गुन्हे दाखल करण्याचा खटला दाखल केला, माजी मंत्री सोभाताई फडणवीस यांनी राजू कुकडे विरोधात रामनगर पोलीस स्टेशनं मध्ये तक्रार दिली आहें, मात्र सर्व जातीय संघटना एकत्र आणून आंदोलन उभे करणाऱ्या व एसआयटी चौकशी करा यासाठी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सात्तत्याने पाठपुरावा करणाऱ्या राजू कुकडे यांचे योगदान मात्र काही दैनिक वृत्तपत्राचे पत्रकार जाणीवपूर्वक विसरतात हे दुर्भाग्यचं म्हणावं लागेल.

चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीत मोठा घोटाळा सुरु असल्याने ही नोकर भरती रद्द करा अशी मागणी पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह राज्याचे सहकार मंत्री सहकार आयुक्त आणि विभागीय सहनिबंधक यांच्याकडे केली होती आणि त्या संबंधाने पत्रकार परिषद घेऊन भ्रष्ट मार्गाने होणारी नोकर भरती प्रक्रिया रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, दरम्यान मागासवर्गीयांचे आरक्षण नोकर भरतीत नसल्याने राजू कुकडे यांनी मागासवर्गीयांच्या सर्व समाज संघटनाना एकत्र करून आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती स्थापन केली आणि प्रथम बैंक मुख्यालयासमोर साखळी ठिय्या आंदोलन सुरु केले, त्यांनंतर आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे मनोज पोतराजे आणि रमेश काळबांधे यांनी आमरण उपोषण सुरु केले, हे आंदोलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले, यामध्ये माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या आंदोलनाला पाठिंबा देतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आवाज पोहचवीला आणि आताच्या एसआयटी चौकशी पर्यंत त्यांनी पाठपुरावा करून आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या आंदोलनाला यश मिळवून दिलं आहें, यामध्ये आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे समन्वयक राजू कुकडे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात समितीचे सदस्य मनोज पोतराजे, रमेश काळबांधे, संजय कन्नावार, सूर्या अडबाले, नभा वाघमारे, अनुप यादव, आबीद अली, राजू बिट्टूरवार, बंडू हजारें, महेंद्र खंडाळे, इंजि दिलीप झाडे, दिनेश एकवनकर, महेश वासलवार यांनी मोठे योगदान दिले.

प्रसारमाध्यमांची ही कसली पत्रकारिता?

सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत बैंक अध्यक्ष आणि संचालकांनी 25 ते 40 लाख रुपये देणाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी मागासवर्गीयांचे आरक्षण डावलले व ऑनलाईन परीक्षेत घोळ करून हुशार विद्यार्थ्यांना नापास करण्याचा डाव खेळला याचा विरोध करून ही नोकर भरती प्रक्रिया रद्द करा अशी सतत मागणी लावून धरणारे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनीच सर्व जातीय संघटनाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना संघटित करून आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती स्थापन केली आणि या माध्यमातून आंदोलन त्यांनी उभारलं, आता त्या आंदोलनाला एसआयटी चौकशी सुरु झाल्याने यश मिळालं असतांना चंद्रपूर च्या काही दैनिक वृत्तपत्राच्या प्रतिनिधीना याचे श्रेय आंदोलन उभं करणाऱ्या राजू कुकडे यांना द्यायचं नाही मग जे सत्य आहें ते मांडलं जातं नसेल तर ही कसली पत्रकारिता? असा प्रश्न उपस्थित होतं आहें, खरं तर सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरती विरोधात जर आंदोलन उभं झालं नसतं तर कदाचित याचा आवाज विधिमंडळात उचलला गेला नसता व आमदार सुधीर मुनगंटीवार यांना हा प्रश्न लावून धरता आला नसता, कारण जोपर्यंत एखादं आंदोलन उभं केल्या जातं नाही तोपर्यंत त्याची दखल होतं नाही ही वस्तुस्थिती आहें, पण एसआयटी चौकशीच गुपित लपवून व आंदोलनाचं स्रोत असणाऱ्या खऱ्या कर्णधाराच नाव गुपित ठेऊन काही प्रसारमाध्यमं आंदोलनाचं महत्व कमी करत आहें. जेंव्हा cdcc बैंकेच्या विरोधात आंदोलन सुरु होतं तेंव्हा काही पत्रकार पैसे मिळाल्याने त्या आंदोलनाच्या बातम्या करत नव्हते तर काही पत्रकारांना त्यांच्या पत्नी किंव्हा नातेवाईक बैंकेत नोकरीवर लावायचे होते म्हणून बातम्या करत नव्हते, पण जेंव्हा अंतिम यादी प्रकाशीत झाली आणि काहींचे नाव गायब झाले तेंव्हा ते पत्रकार सक्रिय होऊन बातम्या तयार करायला लागले म्हणजे उद्देश साध्य झालं नाही म्हणून बातमी बनविणारे निस्वार्थ भावनेने आंदोलन उभं करणाऱ्यांना डावलतात हे निचपणा पत्रकारितेला कलंक आहें असं म्हणावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here