जिल्ह्याचे नेतृत्व अल्पसंख्यांकांना दिल्यामुळे बहुसंख्यांक समाजातील पक्ष कार्यकर्त्यात नाराजीचा उद्रेक?
चंद्रपूर:-
अनेक दिवसापासून जिल्ह्याच्या ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरु असतांना आज अचानक भाजप कडून नव्या जिल्हाध्यक्ष पदाचे नावे जाहीर झाल्याने व त्यात अल्पसंख्यांक समाजातील शहर अध्यक्ष पदी सुभाष कासनगोट्टूवार व चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी हरीश शर्मा यांची नावे जाहीर झाल्याने पक्षातील बहुसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यात प्रचंड नाराजी व्यक्त होतं आहें, दरम्यान जिल्ह्यात सगळीकडे बहुसंख्य समाजातील कार्यकर्ते एकमेकांना फोन करून गुप्त बैठक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहें, त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यात नाराजीचा उद्रेक होऊन पक्षाचा हा निर्णय पक्षाला मोठे नुकसान करेल अशी चिन्हे दिसत आहें.
भारतीय जनता पक्षाने राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे अखेर जाहीर केली आहेत. याआधी पक्षाकडून 58 जिल्हाध्यक्षांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र उर्वरित 22 जिल्ह्यांच्या संदर्भात अंतर्गत मतभेद आणि स्थानिक स्तरावरील राजकीय गणितामुळे ही यादी काही काळासाठी रोखून धरली गेली होती. सध्या काही जिल्ह्यांमध्ये चर्चा पूर्ण झाल्यानंतर आणि स्थानिक व केंद्रीय नेत्यांमध्ये समन्वय साधल्यानंतर या उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात झालेला हा निर्णय पक्षाच्या अंगलट येण्याचे संकेत मिळत आहें.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक सिंह, सह-संघटनमंत्री शिवप्रकाश आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून जिल्हाध्यक्ष निवडीसंबंधी चर्चा केली होती. यानंतर आता भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची आज घोषणा करण्यात आली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांना जिल्ह्याचे नेतृत्व दिल्यामुळे बहुसंख्यांक समाजातील कार्यकर्ते त्यांच्या दावणीला बांधले जातील का हा मोठा प्रश्न असून यावर पक्ष नेतृत्वाने पुन्हा विचार करावा अशा प्रकारचा विचार प्रवाह जोरात सुरु आहें.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांची काय असेल भूमिका?
चंद्रपूर जिल्ह्यात भाजप ला संघटनात्मक दृष्टीने मजबूत करण्यास माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं योगदान आहें, आजही राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री पद मिळालं नसलं तरी त्यांच्या कार्यालयात विविध प्रश्न घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची गर्दी कमी व्हायचे नाव घेत नाही, प्रचंड अभ्यास आणि दररोज त्यांची कार्यक्रमात, बैठकीत उपस्थिती ही लक्षवेधक ठरत आहें, त्यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी मांडलेला चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध प्रश्नासह जिल्ह्यातील औद्योगिक, कर्जमाफीचा, पीक विम्याचा विषय राज्यातील तरुण बेरोजगार व शेतकऱ्यांच्या मनाला स्पर्शून गेला, त्यातच सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट मार्गाने झालेल्या नोकर भरतीची एसआयटी चौकशी त्यांनी शेवटी लावलीच त्यामुळे परीक्षा देणाऱ्या हजारो तरुणांना दिलासा मिळाला की आता ही भरती रद्द होऊन नव्याने भरती होईल व आपल्याला संधी मिळेल,पण मुंगनटीवार यांचं मंत्रिपद गेल्यानंतर त्यांनीच वाढविलेले पक्षातील नेते पदाधिकारी त्यांना आव्हान द्यायला लागले असून पक्षाने केलेल्या या नियुक्त्या त्यांच्या पचणी पडणाऱ्या नाही अशीच एकूण स्थिती आहें. कारण पक्ष संघटन उभं करण्यासाठी पक्षाच्या पदाला फार महत्व आहें, सर्व जाती समूहाला एकत्र करून पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता आणता येते पण ज्यांचा जनसंपर्क दांडगा नाही त्यांना मोठी जबाबदारी देणं हे धोक्याचं ठरू शकतं अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहें.
आमदार किशोर जोरगेवार यांना कासनगोट्टूवार यांच्यामुळे ताकत आली का?
पक्षीय राजकारणात अंतर्गत मतभेद नेहमीच असतात, कधी काळी आमदार सुधीर मुनगंटीवारं यांच्या मागे भाऊ भाऊ म्हणून फिरणारे आणि त्यांचेच वैचारिक आणि आर्थिक पाठबळ घेऊन पुढे विधानसभा निवडणुकीत आमदार झालेले किशोर जोरगेवार अपक्ष निवडून आल्यानंतर मात्र त्यांना जणू आभाळ ठेंगने झाले होते, दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी ला पाठिंबा दिला होता मात्र त्यांचं हिंदुत्व धोक्यात आल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी तुन बाहेर पडून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हाया सुरत मार्गे गुवाहाटी प्रवास करून 50 खोके एकदम ओके चा नारा दिला. आता तेच आपल्या गुरुस्थानी असलेल्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी स्पर्धा करत आहें, त्याचाच एक भाग म्हणजे माझ्याकडून सुभाष कासनगोट्टूवार यांना शहर अध्यक्ष करा ही त्यांची मागणी पक्षाच्या वरिष्ठानी मानली आहें त्यामुळे त्यांची ताकत वाढली असल्याचे बोलल्या जातं आहें. मात्र भाजप चा दुसरा गट हा विरोधात असल्याने बहुसंख्य तेली कुणबी माळी समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहें. जर ओबीसी समाजाचे कार्यकर्ते एकत्र येऊन वरिष्ठानी दिलेल्या नियुक्त्याना विरोध करायला समोर आले तर पक्ष नेतृत्वाला हा निर्णय भारी पडू शकतो अशी एकूण स्थिती आहें.