Home राष्ट्रीय चिंतनीय :- अहमदाबाद विमान दुर्घटनेत सावलीत झोपलेल्या 15 वर्षीय आकाशचा भाजून मृत्यू.

चिंतनीय :- अहमदाबाद विमान दुर्घटनेत सावलीत झोपलेल्या 15 वर्षीय आकाशचा भाजून मृत्यू.

एका आईचा संसार एका सावलीत संपला. मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या आई पण 50 टक्के भाजली मृत्युंशी झुंज सुरु. गरिबांचं कुटुंब उध्वस्त होणार?

अहमदाबाद न्यूज नेटवर्क :-

देशाच्या एअर इंडिया विमानाची अहमदाबाद येथील विमान दुर्घटना ही अत्यंत भयावह व तितकीच चिंताजनक असून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करणारी आहें, कारण ज्या विमानाने हा अपघात झाला त्या विमानाची स्थिती अगोदरचं खराब असताना प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ते विमान का उडविण्यात आले याची चौकशी व्हायला हवी, महत्वाची बाब म्हणजे विमानात बसणारे प्रवाशीच या दुर्घटनेत मरण पावले नाही तर ज्या मेडिकल हॉस्टेलच्या बिल्डिंग मध्ये हे विमान क्रश झाले त्यातील जवळपास 24 विद्यार्थी डॉक्टरांचा मृत्यू झाला आणि त्या परिसरातील दुकानात काम करणाऱ्या लोकांचा पण मृत्युं झाला, त्या त्या ठिकाणी चहा टपरी लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या 15 वर्षीय मुलगा आकाश याचा सुद्धा भाजून मृत्यू झाला पण शासनाकडून प्रवाशी व मेडिकल कॉलेज च्या मृत डॉक्टरांच्या परिवाराला 1 कोटी देण्याचे आश्वासन देण्यात आले तिथे चहा टपरिवर काम करणाऱ्या एका महिलेच्या आकाश नावाच्या मुलाचा भाजून मृत्यू झाल्याने त्या आईला 1 कोटी मिळणार का? हा प्रश्न असून गरीबांचा जीव इतका स्वस्त असतो का? असाही प्रश्न उपस्थित होत आहें.

आकाश हा १४–१५ वर्षांचा असेल त्याची आई हॉस्पिटलबाहेर चहाची टपरी चालवत होती. आकाश तिथे डब्बा द्यायला आला होता आणि सावलीत थोडावेळ झोपी गेला.पण दुर्दैव, एअर इंडियाच्या विमानाचे एक अवशेष त्या रस्त्यावर कोसळले. आगीच्या ज्वाळा त्याच्यापर्यंत पोहोचल्या… आणि आकाशने तिथेच शेवटचा श्वास घेतला.विशेष म्हणजे तो न विमानात होता, ना त्या होस्टेलमध्ये. तो रस्त्याच्या कडेला होता. त्याला वाचवायला धावलेली त्याची आई सुद्धा ५०% भाजली आहे आणि ती सध्या रुग्णालयात मृत्यूसोबत लढतेय. आता प्रश्न असा पडतो की या कुटुंबासाठी कोण पुढं येणार आहे? सरकार? टाटा? ते एक कोटी देणार का? ज्यावेळी एखाद्याला 1 कोटी दिलं जातं, तेव्हा नाचत, टाळ्या वाजवत पोस्ट करणारे आता कुठे आहेत? हा प्रश्न असून न्यूज चॅनेलवर आहे या आकाशची बातमी गायब असून नेत्यांचे मात्र सिनेमॅटिक शॉट्स दाखवले गेले, दरम्यान भगवद्गीता वाचण्याच्या बातम्या चर्चेत आल्या, पण आकाशसारख्या निर्दोष, गरीब बालकाच्या मृत्यूवर कोण बोलणार?

एका आईचा संसार एका सावलीत संपला.

या देशात एक सामान्य गरीब माणूस जर रस्त्यावर शांतपणे डोळे मिटून झोपी गेला, तर त्याचा काय दोष आहें का? त्यांना भविष्य नाही का? आकाश हा झोपेत असतांना त्यांच्यावर आकाशातून ज्वाला पाडल्या आणि तो गतप्राण झाला हा जरी अपघात असला तरी हा एक सामाजिक प्रश्न आहे. गरीबाच्या जीवाला किंमत आहे का? की तो फक्त आकड्यांमध्ये हरवून जातो? आकाशसाठी आवाज उठवने आवश्यक आहें, कारण त्याच्या आईच्या अश्रूंना न्याय देणं आपलं कर्तव्य आहें आता ते कर्तव्य कोण पार पाडतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहें. एका आईचा संसार सावलीत संपला आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here