चंद्रपूर शहरात युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा “नवा पर्व – अजित पर्व” उपक्रम राबविण्यास सुरुवात :
महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक संघटन मजबूत करण्याचा निर्धार
चंद्रपूर :- 24 जून 2025 : आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक आघाडीने चंद्रपूर शहरात नव्या जोमाने काम करण्याचा निर्णय घेतला असून, “नवा पर्व – अजित पर्व” या उपक्रमाअंतर्गत युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढविण्याचा आणि शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये शाखा स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
या उपक्रमाचा शुभारंभ व त्यासंदर्भातील नियोजनासाठी दिनांक 24 जून रोजी तुकूम येथील पक्ष कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत शहरातील सर्व प्रभागांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या.
“वॉर्ड तिथे शाखा, शाखेतून नेतृत्व” या संकल्पनेवर आधारित या अभियानामध्ये प्रभागनिहाय युवकांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच, स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी युवक कार्यकर्त्यांना सजग भूमिका निभावण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
युवक जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्टपणे सांगितले की, “राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा समाजाशी नाळ जोडून काम करणारा असावा. येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत जे कार्यकर्ते त्यांच्या प्रभागात चांगले काम करतील, स्थानिक प्रश्नांवर काम करतील त्यांनाच पक्षाकडून संधी दिली जाईल.”
बैठकीला युवक महासचिव राहुल वाघ,युवक महासचिव विपील लभाने, तसेच राहुल रेवल्लीवार, अंकित लाडे, चिकू टेम्भूरने, प्रतीक देशपांडे, अब्रार शेख, मयूर नागरकार, यश साखरे, अदव्य मेश्राम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत पुढील काही दिवसांत वॉर्डनिहाय शाखा स्थापनेसाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, त्यांना सामाजिक प्रश्नांबद्दल जागरूक करणे व त्यांची ऊर्जा रचनात्मक कार्यात वापरणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे.
“नवा पर्व – अजित पर्व” ही केवळ एक राजकीय मोहीम नसून, ती चंद्रपूर शहराच्या सामाजिक विकासासाठी आणि युवकांच्या सामर्थ्याचा योग्य उपयोग करण्यासाठीचा एक व्यापक उपक्रम ठरणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हे नवे पर्व निश्चितच चंद्रपूरच्या राजकारणात नवे वळण देईल, असा विश्वास या बैठकीनंतर व्यक्त करण्यात आला.