Home चंद्रपूर मनसे इशारा :- सिद्धपल्ली व्यवस्थापन व कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल...

मनसे इशारा :- सिद्धपल्ली व्यवस्थापन व कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- मनसेची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी :-

ताडाळी एम.आय.डी.सी. मध्ये निर्मानाधीन असलेल्या सिद्धपल्ली स्टील प्लांट मध्ये सुरक्षा वाऱ्यावर सोडून व सर्व नियमांचे उल्लघन करून कंपनी च्या आतमध्ये काम सुरु आहे. कुठलेही सुरक्षा साधने नसल्याने कंपनी मध्ये अनेकदा किरकोळ अपघात तर होतातच पण दोनदा मोठे अपघात सुद्धा झाले आहे त्यात कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.

एकीकडे स्थानिक बेरोजगार युवकांना डावलून बाहेरील आणलेल्या कामगार आणले जातात त्या कामगारांची कोणत्याही पोलीस सत्त्यापण पडताळणी कंपनी व्यवस्थापन करत नाही आणि ह्यामुळेच जर कोणता अपघात कंपनी मध्ये घडला तर कंपनी त्या कामगाराला कोणताही लाभ न देता सरळ त्याच्या गावी त्या कामगारांचे प्रेते रवाना करीत असल्याचे देखील समोर आले आहे. या कंपनीत काही कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार देखील दिलेले नसून महागाई व कोरोनामुळे कामगार वर्ग अडचणीत सापडला आहे. अर्थात हे सर्व अपघात कंपनी व्यवस्थापनाची मुजोरी यामुळेच घडत असल्याने यासाठी कंपनी व्यवस्थापन व मालक जबबदार असल्याने त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा या करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मा.जिल्हा अधीक्षक निवेदन देण्यात आले असून येत्या काही दिवसात कामगारांच्या विविध समस्या बाबत मनसेचे शिष्टमंडळ कामगार आयुक्तांची भेट घेणार आहे व कामगारांचे प्रश्न मार्गी न लागल्यास लवकरच मनसे जनआंदोलन उभारणार असा इशारा मनसेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे मनसेच्या शिष्टमंडळात मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार,मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार,महिलासेना जिल्हाध्यक्ष सुनिताताई गायकवाड,मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे,मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर,मनसे सचिव मनोज तांबेकर, अर्चना आमटे,करण नायर,मयुर मदनकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here