Home भद्रावती खळबळजनक :- भद्रावती येथे भाजप च्या पदाधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन कंपन्याच्या निषेधार्थ...

खळबळजनक :- भद्रावती येथे भाजप च्या पदाधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन कंपन्याच्या निषेधार्थ टॉवरवर चढून केली वीरुगीरी.

 

चंद्रपूर जिल्हयातील शेतकरी कृषी पंप, व्यवसायीकदार, घरगुती विदयुत ग्राहकांचे विदयुत कनेक्शन कापणे त्वरीत थांबविण्याची केली मागणी.

भद्रावती प्रतिनिधी ;-

भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर ग्रामिण तर्फे आघाडी शासनास निवेदना द्वारे विनंती करण्यात आली होती की ज्याअर्थी वीज ग्राहकाचे विज कनेक्शन कापनार नाही अशी घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती परंतू शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात संपताच परत आपल्या निर्णयावर ठाम न राहता शेतकरी, लहान व्यापारी आणि गरिब नागरिकांचे विदयुत पुरवठा कापने सुरू केले आहे. हा जनतेवर होणारा अन्याय असून. आधीच कोरोनाच्या साथीमुळे शेतकरी, गरिब व्यापारी, गरीब नागरिक आर्थिक दृष्टया कमकुवत झालेले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने वीजबिल माफ करणे गरजेचे होते. परंतु घोषणा करून सुद्धा सरकार गोरगरिब जनतेची थट्टा करित आहे. विज बिल न भरणाया ग्राहकांची वीज तोडली जात आहे. ज्या जनतेनी सरकारला सत्तेवर बसविले सरकार त्या जनतेची पिळवणूक करित आहे. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर ग्रामिणचे संपूर्ण पदाधिकारी गोरगरीब जनतेच्या सोबत असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. अशा आशयाचे निवेदन देऊन वीज कनेक्शन तोडणे त्वरीत थांबवावे त्याकरिता आज दिनांक १४/०३/२०२१ रोजी इम्रान खान जिल्हाउपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा ग्रामिण आणि केतन शिंदे जिल्हा सचिव भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा ग्रामिण तर्फे आज बी.एस.एन.एल टावरवर चढून आंदोलन करत आहेत.

जर या आंदोलनाची दखल शासन प्रशासनाने घेतली नाही आणि लिखित स्वरूपात जर आश्वासन मिळत नाही तो पर्यंत खाली उतरणार नाही. जर आम्हाला बळजबरीने उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा आंदोलनकर्त्यानी केल्याने पोलीस प्रशासन यासह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here