इकडे मुलांच्या काळजीने मानसिक तणावात असलेल्या पंकजने खाणेपिणे सोडल्याने परिवाराची वाढली चिंता.
भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-
मुलं कितीही वाईट वागले तरी आई मात्र आपल्या मुलांसाठी कायम यातना सहन करत असते ही भारतीय संस्कृती आहे पण जेव्हां आईच मुलांना एकटे सोडून व दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून जाऊन लग्न करते अर्थात ती मुलांची वैरीन ठरते तेंव्हा त्या लहान मुलांचे काय? असा गंभीर प्रश्न निर्माण होतो.
कहाणी नव्हे तर हकिगत अशी आहे की पूजा नामक एका महिलेने अनेक वर्षापासून ज्या भावाला राखी बांधली त्याच भावा सोबत पळून जावून लग्न केले व आपल्या नऊ व चार वर्षाच्या मुलांना एकटे सोडले असल्याची धक्कादायक घटना राळेगाव येथे घडली. पती पंकज याचे सोबत प्रेम विवाह रचून तब्बल दहा वर्ष एकत्र संसार करणाऱ्या पूजा ला अचानक त्याच्या सोबत रहाण्याची इच्छा होत नाही व ती मानलेल्या भावासोबत पळून जावून लग्न करते म्हणजे ती स्त्री किती नंबरीएक आहे हे शीद्ध होते, खरं तर तिने मानलेल्या भावासोबत लग्न केल्याची कबुली केली मात्र आपले पाप लपविण्यासाठी ती कशी चक्क खोटी बोलते आणि बहाने करतेय हे तिचा ऑडियो ऐकल्या नंतर कळते अशा स्त्रीला समाजात काय प्रतिष्ठा मिळेल हे न सांगितलेलच बरं. परंतु पत्नी वियोगाने पती पंकज ची मानसिक स्थिती बिघडली असून त्याने खाणेपिणे सोडले असल्याने त्याचा परिवार चिंतेत आहे.