Home चंद्रपूर चिंताजनक :- भय इथले संपत नाही.चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 18 बाधितांचा मृत्यू?

चिंताजनक :- भय इथले संपत नाही.चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 18 बाधितांचा मृत्यू?

 

प्रशासनाचे व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आकड्यांत फरक? 1135 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली.

कोरोना अपडेट :-

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असून मागील 24 तासात 18 कोरोना बाधितां चा मृत्यू झाला असून 1135 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे अर्थात वाढत असलेला कोरोना बाधितांचा मृत्यू व सोबतच नव्या कोरोना बाधितांची वाढ यामुळे भय इथले संपत नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली असल्याने व आरोग्य प्रशासनाकडे व्हेंटिलेटर्स चा अभाव सोबतच इंजेक्शन चा तुटवडा यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमधे भीतीचे वातावरण सर्वत्र दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे जिल्हा माहीती कार्यालयाकडून येणाऱ्या कोरोना बाधितांचा आकडा व जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रत्यक्ष येणारी प्रेते यामधे तफावत असून आज प्रत्यक्षात 18 प्रेते जिल्हा सामान्य रुग्णालयात आली असतांना जिल्हा माहीती कार्यालयाकडून केवळ 7 बाधितां चा मृत्यूझाल्याची माहीती पत्रकारांना देण्यात आली

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 39 हजार 54 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 29 हजार 554 झाली आहे. सध्या 8948 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 20 हजार 367 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 74 हजार 986 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये घुग्गुस येथील 66 वर्षीय पुरुष, राजोली मुल येथील 53 वर्षीय पुरुष, विकास नगर वरोरा येथील 86 वर्षीय पुरुष, दडमल वार्ड चंद्रपूर येथील 59 वर्षीय पुरुष, नगीना बाग चंद्रपुर येथील 43 वर्षीय महिला, गजानन महाराज चौक चंद्रपूर येथील 47 वर्षीय पुरुष, न्यू पटोले नगर येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 552 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 505, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1135 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 463, चंद्रपूर तालुका 58, बल्लारपूर 81, भद्रावती 107, ब्रम्हपुरी 118, नागभिड 37, सिंदेवाही सात, मूल 26, सावली चार, पोंभूर्णा तीन, गोंडपिपरी सहा, राजूरा 25, चिमूर चार, वरोरा 155, कोरपना 15, जीवती 11 व इतर ठिकाणच्या 15 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here