अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १०० व्या ‘मन की बात’ या उपक्रमाचे औचित्य साधून आज दिनांक ३०,०४,२०२३, ला हनुमान नगर येथे नविन गुरुदेव सेवा महिला मंडळ स्थापन करण्यात आले. देशातील आवडते पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींचा १०० वा मनकी बात कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११४व्या ग्रामजयंती निमित्ताने नविन गुरुदेव सेवा मंडळ स्थापन करण्यात आले. सकल्प गिताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले . विजय चिताडे मध्यवर्ती प्रतिनिधी, सुनिता गुज्जनवार यांनी मार्गदर्शन केले. सर्वांनी मिळून र. जी. प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष कासनगोट्टीवार, विजय चिताडे, धर्माजी खंगार, गोकुलदास पिंपळकर सुधाकर बोंडे, सुनिता गुज्जनवार, पुष्पा झाडे उपस्थित होते.या वेळी सौ सुरेखा ताई बोंडे यांची एक मताने ग्रामसेवाधिकारी म्हनून निवड करण्यात आली.