Home चंद्रपूर मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी न चुकता रक्तदान करणाऱ्या वडीलाने केले मुलाच्या (प्रथम जयंतीला)...

मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी न चुकता रक्तदान करणाऱ्या वडीलाने केले मुलाच्या (प्रथम जयंतीला) रक्तदान वडील असावा तर असा?

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :-  एका मुलाला वडील मिळावा तरी कसा ही एक दुःखद कथा एका नियमित रक्तदान करणार्या वडिलांची कथा आहे.
एक रक्तदाता किव्हा वडील कसा असावा? ह्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण श्री. जितेंद्र मशारकर हा रक्तदात्या आपल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी तर रक्तदान करायचं परंतु मुलाच्या वाढदिवसाला पण रक्तदान करायचा आणि आज दिनांक १४,०७,२०२३,ला त्यांच्या मुलांचा वाढदिवस असतो परंतु एका वडिलांना देव देणार तरी किती दुःख देणार कारणं या रक्तदाता च्या मुलाचा वाढदिवसाच्या अगोदरच गंभीर आजाराने निधन झाले आहे. पण वडील असाव्हा तर असा या वडीलाने आपले दुःख बाजूला ठेवून आज मुलांच्या ०८,व्या वाढदिवसाच्या दिवशी (प्रथम जयंती) म्हणून विक्रमी ६८, व्या वेळी रक्तदान केले. कारण यांचा उद्देश आहे. की कधी कोणाला संकटाच्या वेळी मदत करणे हे खूप मोठे कार्य आहे. या वेळी जितेंद्र मशारकर याच्या माफक अपेक्षा एकच की एखाद्या दुर्देवी रुग्णाचे रक्ता अभावी प्राण जाऊ नये. आज ६८ व्या वेळी रक्तदान करून दरवर्षी मुलाच्या जयंतीनिमित्त रक्तदान करण्याचा त्यांचा मानस आहे. अशा रक्तदात्यास मानाचा मुजरा!
रक्तदात्यांना अजून कसली प्रेरणा पाहिजे? आज मानवाने अगदी भूगर्भापासून ते चंद्रापर्यंत प्रगती केली, इतकेच काय दुधाची पावडर तयार केली,परंतू आजही रक्ताची कुठलीही प्रयोगशाळा वा रक्ताची पावडर तयार करू शकला नाही, प्राणी रक्तदान करू शकत नाहीत, फक्त मानवच रक्तदान करून दुसर्या मानवाचा जीव वाचवू शकते.रक्तदान केल्याने एखाद्या रुग्णाचे प्राण वाचतात.आज रक्तदाता जितेंद्र मशालकर यांचे ६८, व्या विकर्मी रक्तदाना बदल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिषाशा डॉ, मिलिंद फुल पाटील, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सल्ले चिकित्सा डॉ, महादेव चिंचोळे व रक्तकेंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयचे डॉ, पंकज पवार आणि डॉ, अनंत हजारे, यांनी या वेळी जितेंद्र मशारकर यांचे आभार मानले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आणि चंद्रपुरातील नागरिकांना व युवा पिढीला रक्तदानाचे महत्त्व सांगितले.

रक्तदान का करायचे व रक्तदान केल्यास त्यांचा फायदा

एका युनीट रक्तदानाने आपण ३ रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. गरजू रुग्णास या रक्तदानाने जीवनदान मिळते. रक्तदानामुळे नवीन रक्त पेशींची निर्मिती होते रक्तदानानंतर शरीर लगेच नव्या रक्तपेशींची निर्मिती करते त्यामुळे रक्तदात्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नियमित रक्तदान केल्याने रक्ताभिसरण संस्था सुरळीत राहते,हृदयरोगाचे प्रमाण कमी होते,हेमोक्रोमेटोसिस हा रक्तामध्ये अतिरिक्त लोहा मुळे होणारा विकार रक्तदानामुळे दूर राहतो. रक्तदानामुळे रक्तातील लोह घटकाचे प्रमाण नियंत्रित झाल्याने कर्करोग होण्याचे जोखीम कमी होते. ठराविक पातळीपर्यंतच रक्तात लोह हवे अन्यथा कर्करोगाला ते कारणीभूत ठरू शकतात. लोहाचे प्रमाण जर जास्त तर आरोग्याचे इतर समस्या निर्माण होतात, हे संतुलन रक्तदानामुळे राखता येते.
रक्तदानामुळे लोहाचे अतिरिक्त प्रमाण कमी झाल्यामुळे हृदय व यकृताचे आरोग्य राखण्यास मदत होते. अनेक जण भरपूर अन्न सेवन करतात त्यातील ठराविक भागच उपयोगी पडतो उर्वरित भागाचा संचय अनारोग्यकारक चरबीचा रुपात यकृत स्वादुपिंड हृदयाच्या वाहिन्यात जमा होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात येते. रक्तदान ही सोपी आणि अल्पावधीत पार पडणारी प्रक्रिया आहे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही.तेव्हा रक्तदात्यांनो पुढे यावे आणि रक्तदान करावे.
ब्रिद वाक्य-रक्त द्या प्लाझ्मा द्या जीवनाचा हा वाटा वारंवार द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here