अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- राज्य शासनाने आज सादर केलेल्या बजेटमध्ये वाढत्या महागाईबद्दल तरतूद नाही. शेतीविषय धोरणांसंदर्भात कुठल्याही प्रकारची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात येणार आहे. त्यांची आर्थिक तरतूद दाखवण्यात आलेली नाही.
आज सादर झालेला अर्थसंकल्प हा जन सामान्यांची फसवणूक करणारा आहे. या अर्थसंकल्पात बेरोजगार युवक,युवतींना, व शेतकरी, जनसामान्यांकरीत कुठलेही स्थान नसल्याचे दिसून येत आहे.
दिनेश दादापाटील चोखारे
प्रदेश कार्याध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ
उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर
माजी सभापती तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर