शाळेकरी मुलं मुलींचं व युवकांचं उदय लॉज ठरतंय का प्रेमविस्वातल्या रासलिलेच ठिकाण?
भद्रावती :-
औधोगिक म्हटलं जाणारं भद्रावती शहर हें पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, अनेक पौराणिक वास्तू शिल्प आणि धार्मिक वास्तू यांमुळं भद्रावती शहराला एक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. पण नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील राजू कारेमोरे नावाच्या एका इसमाने शहरातील उदय लॉज वर अल्पवयीन मुलामुलींना व युवकांना प्रेमाचं अभिव्यक्त करणार व प्रेमाचा आंनद घेणार ठिकाण बनवून सामाजिक आरोग्य बिघडविण्याचा धक्कादायक प्रकार सुरु असल्याची चर्चा आहे, दरम्यान या त्यांच्या खेळात कोण कोण साथ देतंय याबद्दल लवकरच एक मोठा गौप्यस्फ़ोट होणार असल्याची माहिती आहे.
मागील अनेक वर्षांपासून नागपूर चंद्रपूर महामार्गांवर भद्रावती शहरात उदय बारच्या वरती उदय लॉज सुरु आहे, या लॉजवर अनेक कंपनीचे अधिकारी शासकीय कर्मचारी रहातात असे चित्र दिसत होते, मात्र आता या ठिकाणी राजू कारेमोरे यांनी मायानगरीतील प्रेमाविरांच्या रासलीला सुरु केल्या असल्याच्या चर्चा आहे, परिस्थिती व्यवसायची आहे इथपर्यंत ठीक आहे, पण या ठिकाणी शाळेकरी मुलं मुली सुद्धा आपल्या अव्यक्त प्रेमाच्या प्रेमकाहण्या रासलेलच्या माध्यमातून रचत असल्याचे विदारक दृश्य अधोरेखित होतं असून येथे जागा कमी पडतेय म्हणून पुन्हा दुसरा लॉज किरायाने घेऊन राजू कारेमोरे यांचा गोरखधंदा सुरु आहे त्यामुळे याचा बंदोबस्त पोलीस करणार का? की भद्रावती शहराच सामाजिक आरोग्य बिघडविणाऱ्या राजू कारेमोरे यांना अभयदान देणारं हें पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.