जिल्ह्यातीलच चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी येथील पाच युवकांचा दुर्दैवी मृत्यू, गावात पसरली शोककळा.
चंद्रपूर / चिमूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेल्या पाच मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून चिमूर तालुक्यातील ही पाच मुले असल्याचे बोलल्या जातं आहें, दरम्यान आज शनिवारी (15 मार्च) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी नागभीड पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी शोधमोहीम राबवित पाचही युवकांचे मृतदेह बाहेर काढले असल्याची माहिती आहें.
चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी ही 5 मुले होते. जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. यापैकी दोन सख्खे भाऊ असून दोन चुलत भाऊ आहेत. हे चार जण गावंडे कुटुंबातील आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे.
काय आहें घोडाझरी पर्यटन स्थळ
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घोडाझरी पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी ब्रिटिश कालीन तलाव आहे. तलाव व पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे बारमाही पर्यटकांची गर्दी असते. शनिवार आणि रविवारी तलावावर बाहेरून पर्यटक येतात. आज शनिवारी चिमूर तालुक्यातील साट गाव कोलारी येथील जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज हिंगोली हे सहा मुले पर्यटनासाठी आली होती. दुपारपासून त्यांनी घोडाझरी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला.
यानंतर त्यांना पोहावयाचे राहवले नाही. त्यामुळे सायंकाळी चारच्या सुमारास नळ पाणीपुरवठा योजना योजनेच्या विहिरी असलेल्या परिसरात सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली. पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्यामुळे सहाही जण डोहामध्ये बुडाले. त्यापैकी आर्यन हेमराज हिंगोली हा 16 वर्षाचा मुलगा कसाबसा वाचला तर उर्वरित जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे हे पाचही मुले तलावात बुडाली. पाच मुलांपैकी चार गावंडे कुटुंबातीलच आहेत.
दोन सख्खे भाऊ यांचा करून अंत
त्यामध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे. सर्व मुले 18 ते 22 वर्षे वयोगटातील आहेत. तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने सदर घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर तत्काळ नागभीड पोलिसांना माहिती देण्यात आली. अवघ्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाचही मुले तलावातच बुडालेले आहेत अशी सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना साटगाव कोलारी येथे देण्यात आलेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक चौकशी सुरू करीत तात्काळ शोधमोहीम राबवित बुडालेल्या युवकांचे मृतदेह बाहेर काढले.