बैंकेच्या संचालक पदाच्या निवडणुकी दरम्यान परीक्षेत कसे पास करण्यात आले यासह पैशाचे व्यवहार पण होणार उघड.
चंद्रपूर:-
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या संचालक पदाची निवडणूक तब्बल 13 वर्षानंतर आता होणार असून नामांकन फॉर्म भरणे सुरु आहे, मात्र बैंकेच्या नोकर भरतीमध्ये झालेला 100 कोटिपेक्षा मोठा घोटाळा ज्या संचालकांनी केला त्यांच्ये असली चेहरे समोर यायला लागले असून ऐन निवडणूकीच्या काळात ते कोण संचालक आहेत आणि त्यांनी कुणाकुणाकडून किती किती पैसे घेतले आणि त्यांना त्या बदल्यात कसे सायबर तंत्र वापरन पास करण्यात आले याचा पण लेखाजोखा आता उघड होणार आहे, एकीकडे सर्व भरती प्रक्रियेचे नियम पायदळी तुडवून नोकर भरती प्रक्रिया राबवली व नंतर पैशाचा बळावर सगळी यंत्रणा हातात घेऊन नोकर भरती हायजाक केली याची चर्चा अगोदरच जोरात सुरु असताना आता याबाबत ठोस पुरावे समोर येतं आहे.
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकर भारतीत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारात विद्यमान संचालक तथा सीईओ कल्याणकर यांची मोठी खेळी आता उघड होत असून नोकर भरती परीक्षेचे ऑनलाइन फॉर्म भरण्यापासून तर नियुक्ती पत्र देण्यापर्यंत सर्वच व्यवहार संदिग्ध पद्धतीने राबवून हजारो हुशार विद्यार्थ्यांच्या हक्काच्या नोकरीवर पाणी फेरल्या गेल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेले आंदोलन हे नंतर सर्व जातीय संघटना मिळून आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून अधिक तीव्र करण्यात आले होते, दरम्यान एसआयटी चौकशी च्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.आता एसआयटी चौकशीतुन भ्रष्ट संचालकांचे आर्थिक व्यवहार उघड होणार असून त्यापैकी जे संचालक बैंकेच्या निवडणुकीत उभे आहे त्यांच्या संपूर्ण रेकॉर्डिंग त्यांचे देवाणघेवाण केलेले व्यवहार त्यामध्ये साक्षीदार सगळेच तपासले जाणार असल्याने व प्रसारमाध्यमातून ते जनतेसमोर येणार असल्याने त्या भ्रष्ट संचालकांना निवडणूक लढणे कठीण होणार असल्याचे संकेत मिळत आहे.
बैंक व्यवस्थापन नोकर भरती च्या चौकशीला कशी घाबरली?
सीडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरती विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या अथक संघर्षानंतर शासनाने भंडारा जिल्हा उपनिबंधक कांबळे यांच्या नेतृत्वात विभागीय चौकशी लावली व त्यात तक्रार कर्त्यांचे बयानं नोंदविले गेले, परंतु नंतर बैंक व्यवस्थापन आणि सत्ताधारी संचालक यांना त्या समितीपुढे जे उत्तर द्यायचे होते, ते उत्तर द्यायचे कसे या पेचात सापडलेल्या व कारवाई होणार या भीतीने घाबरलेल्या भ्रष्ट सत्ताधारी संचालकांचे धाबे दणाणले आणि त्यांनी “भ्रष्टाचाराच्या महामेरू बहुत बॅंकेचा लुटारू” म्हणून ओळख असणाऱ्या बॅंक सीईओ कल्याणकर यांना समोर करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चौकशी समितीवर स्थगिती आणण्याचे पातक केले. पण माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेवटी बॅंकेच्या नोकर भरतीसह संपूर्ण आर्थिक प्रकरणाची एसआयटी चौकशी लावण्यात आल्याने विद्यमान भ्रष्ट संचालकांचे आता काय होणार? त्या भ्रष्टाचारी संचालकांच्या करून कहाण्या मोठ्या प्रमाणात चचिंल्या जात आहे.