Home कोरपणा लक्षवेधक :- संघर्षातून घ्येय प्राप्तीचा मार्ग शोधणारे इंजि. दिलीप झाडे बनले युवकांचे...

लक्षवेधक :- संघर्षातून घ्येय प्राप्तीचा मार्ग शोधणारे इंजि. दिलीप झाडे बनले युवकांचे प्रेरणास्रोत.

कोरपना सारख्या आदिवासी बहुल भागात आदिवासी मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून साधली खरी समजसेवा.

लक्षवेधक :-

कुठलाही राजकीय शैक्षणिक वारसा नसताना कुटुंबाच्या आर्थिक विवंचनेत सुद्धा जिल्ह्यातील कोरपणा सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात इंग्लिश मिडीयम मध्ये शाळा सुरु करणारे व स्कॉलर्स सर्च अकॅडमी च्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांना कमी खर्चात इंग्रजी भाषेत शिक्षण्याची संधी उपलब्ध करून सामाजिक शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे व संघर्षातून घ्येय प्राप्तीचा मार्ग शोधणारे इंजि. दिलीप झाडे युवकांचे प्रेरणास्रोत बनले आहे.

दिलीप झाडे हे 15 जुलै 2001 ला इंजिनियरिंग फर्स्ट क्लास मध्ये 2001 ला पास झाले होते. पण त्यांना लेक्चरर् पोस्ट साठी मॅनेजमेंट नी नाकारले. इंजिनिअरिंग त्यांनी 1992 साली केली होती. आर्थिक बाजू कमजोर असल्यामुळे त्यांना नंबर लागूनही इंजिनिअरिंग करता आले नाही. यामुळे अनेक खाजगी फॅक्टरीत काम केल्यानंतर त्यांनी 1996 ला एका संस्थेत स्थिर नोकरी पत्करली व 6 वर्षाचे गॅप नंतर 1998 लां नोकरी करीत असताना फुल टाईम इंजिनिअरिंग ला प्रवेश घेतला. दरम्यान मॅनेजमेंट नी त्यांना खूप सपोर्ट केला. त्यामुळेच त्यांचे बॅचलर ऑफ इंिनिअरिंग फर्स्ट क्लास मध्ये पूर्ण झाले. ते त्यावेळी आनंदी झाले पण नियती खूप काही वेगळे ठरविते व वेळच त्याचे उत्तर देत असते. दरम्यान त्यांनी संस्थेचा राजीनामा दिला त्यावेळी ते प्रचंड तणावात आले. पण त्यावेळी त्यांनी असाही सकारात्मक विचार केला की एक दिवस आपणच स्वबळावर उच्च दर्जाचे, लोकांसाठी, समाजासाठी, ग्रामीण मुलांसाठी चांगले काम केले तर हेच लोक आपल्याला फॉलो करेल…ह्या विचाराने त्यांच्यात प्रचंड विश्वास निर्माण झाला होता. व तो सकारात्मक विचार त्यांना प्रेरणादायी ठरला, मार्ग खुपचं कठीण होता…पण अश्यक्य नव्हता. कारण ते सामान्य शेतकऱ्याचा गावाकडील मुलगा म्हणून अनेक खाचखळगे पार करून आले होते. खरे तर प्रबळ इच्छाशक्ती ने जग जिंकता येते हे वाक्य त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले आणि त्याचं दिवसापासून सुरू झाली संघर्षाची नवी दुनिया.

मायक्रोप्लॅनिंग असेल तर काहीही शक्य?

अत्यंत गुप्त पद्धतीने, कुणालाही न सांगता..फारसा गवगवा न करता….दररोज सूक्ष्म प्लॅनिंग करीत, नोकरी न सोडता सुरू केला नव्या संघर्षाचा प्रवास. खरं तर जे काही होते चांगल्यासाठीच होते, कुणावरही अपयशाच खापर , कुणालाही दोष न देता त्यांचे काम सुरू झाले.. त्या दिवसापासून ते कधीच स्वत्थ बसले नाही. त्यांनी आता शिकले होते की नाकारणे म्हणजेच तुम्हाला जगासमोर सिद्ध करण्याची मोठी संधी आहेत. ह्याच तत्वाने काम सुरू केले. एक दिवस माझाच राहील व ज्यांनी नाकारले तेच तुमच्यावर प्रचंड प्रेम करेल. याच भावनेने ते काम करायचे. कधिही त्यांचे बद्धल चुकीचे बोलायचे नाही. होऊ शकते आपले काम, तत्व पटले नसेल कदाचित पण एक दिवस नक्की पटेल या भावनेने आपला शत्रूही आपल्याला मित्र बनविता आला पाहिजे तेव्हाच मोठे कार्य करता येते. हा विचार करून अत्यंत शुद्ध प्रामाणिक भावनेने त्यांचे काम सुरू झाले. हे दिवस म्हणजे त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी होती. ती त्यांनी स्वीकारली आणि सुरु झाला त्यांचा प्रचंड संघर्षाचा वेदनादायी प्रवास. या संघर्षात जिंकेल की नाही याचे उत्तर काळच देणार होता. प्रचंड रिस्क होती. कारण शारीरिक , कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय अशी ज्यावेळेस कुठलीच पार्श्वभुंमी नसते तेव्हा जिंकण्याची शास्वती फारच धूसर असते. पण स्वतःवरचा प्रचंड आत्मविश्वास, प्रामाणिकता व प्रबळ इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीला सुध्धा लढाई किती अवघड होती हे माहीत असतांना सुद्धा त्यांनी पतीच्या निर्णयावर पूर्ण विश्वास होता.

ध्येय निश्चित असेल तर यश मिळतेच हा विश्वास ऊर्जा देणारा.

अनेक कोर्ट कचेऱ्या, पोलिस स्टेशन, गद्दार , स्वार्थी , लोकांचाही सामना मोठ्या धर्याने त्यांनी केला पण यातून त्यांना अनेक गोष्टी शिकवून गेल्या आणि त्यांना पुन्हा प्रचंड परिपक्व बनविले कारण ध्येय निश्चित असेल तर यश मिळतेच हा विश्वास त्यांना ऊर्जा देणारा ठरला आज ज्यावेळेस ते मागे फिरून पाहतात तर आपण किती संकटाचा सामना करून ही मोठी लढाई जिंकली आहेत याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो. याहिपलिकडे अगदी सामान्य गाव खेड्यातले मुले 80%, 90% चे वर मार्क्स घेतात मोठी स्वप्ने बघतात. हीच यांची यशाची मोठी पावती आहेत. या मुलांनाही अगदी माफक फीज मध्ये सर्व उच्च दर्जाचे शिक्षण अगदी त्यांचे जवळ मिळावे..चांगला नागरिक बनावा याच हेतूने.स्कॉलर्स सर्च ची निर्मिती त्यांनी केली. स्कॉलर्स सर्च ही कधीच माझी नव्हती तर लोकांसाठी, ग्रामीण मुलांसाठी उभारली होती असे ते मानतात, खरे तर ती देशाची संपत्ती आहे आणि याच भावनेतून आर्थिक संकट आली असताना प्रचंड रक्त आटवून संस्था उभारली गेली आहे, खरे तर स्कॉलर्स हे त्यांचे हार्ट आहेत व येथील मुले त्यांच्या धमन्या आहेत असे ते मानतात, या संस्थेत आजमितीस 50 गावातील 700+ आदिवासी विद्यार्थी सहित अनिवासी व निवासी नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षण घेत आहेत. दहावीच्या ९ बॅचेस 100% रिझल्ट व 12 वी सायन्स क्या 7 बॅचेस 100% रिझल्ट देणारी नामांकित शाळा कोरपना तालुक्याच्या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहेत. येथील शिक्षण घेणारे बहुसंख्य गरीब आदिवासी मुले, शेतकरी शेतमजूर यांची मुले आहेत. आज त्यांची टक्केवारी बघितली तर.. .शहरी मुलांपेक्षा उच्चतम आहेत. सहा एकर परिसरात 80000 स्वे फिट बांधकाम शाळा इमारत, हॉस्टेल, सभागृह, स्टेज, प्ले ग्राउंड, किचन शेड. स्मार्ट क्लासेस, कॉम्प्युटर लॅब, ग्रंथालय.आधुनिक सर्व सुविधेची सुसज्ज आहेत. स्टाफ ला पूर्ण ट्रेनिंग देऊनच येथे शिक्षण दिल्या जाते. आज खेड्यातील मुलांसाठी स्कॉलर्स सर्च म्हणजे प्रतिभावंत, ज्ञानवंत मुलांची प्रबोधिनी आहेत. अशा या संपूर्ण संघर्षातून इंजि. दिलीप झाडे यांनी युवकांना एक प्रेरणा दिली आहे की ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो तो आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहचतो आणि म्हणूनच इंजि दिलीप झाडे ध्येयवेड्या युवकांचे आयकॉन झाले आहे असेच म्हणावे लागेल, आज त्यांचा वाढदिवस आहे, परमेश्वर त्यांना पुन्हा अभूतपूर्व कार्य करण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना व पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here