Home चंद्रपूर घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करू या, यंदा कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी...

घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करू या, यंदा कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारु या.

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचे चंद्रपूर, जनतेला आव्हान ! जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी सुद्धा  संचारबंदीचे नियम पाळण्याचे केले जनतेला आव्हान ! 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

यंदा मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असल्याने गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी घराबाहेर जाऊ नका, घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा,असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले असून नागरिकांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठी दारावर तोरण हमखास लावले जाते. त्याशिवाय गुढी उभारून तिला साखरगाठ्यांची माळ घातली जाते. सोनेखरेदी, कपडे खरेदीही केली जाते. मात्र, या खरेदीसाठी यंदा घराबाहेर पडू नये. असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले आहे. राज्यात संचारबंदी लागू आहे.या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याला खरेदीसाठी बाहेर जाऊ नका, खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी केली तर कोरोनापासून संरक्षणासाठी उचलण्यात येत असलेल्या कठोर उपाययोजनांचा उपयोग होणार नाही, याचीही जाणीव त्यांनी करून दिली आहे.

यंदा मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असले तरी घरोघरी गुढ्या उभारल्या जातील. परंतु, शोभायात्रांचं आयोजन व सामुहिक आयोजन टाळण्याचं आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

साखरेच्या गाठी स्वतःच घरी तयार करा,घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा मात्र बाजारात गर्दी करू नका. बत्ताश्यांऐवजी घरातच गोड पुऱ्या करून त्यांचा हार गुढीला घालता येईल. पूर्वी घरोघरी श्रीखंड घरातच तयार करत असत. तोच कित्ता पुन्हा गिरवता येईल, अशा आठवणीही त्यांनी जागवल्या. नागरिकांनी यंदा कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असं आवाहनही त्यांनी केले आहे.

या प्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा काही महत्वपूर्ण निर्णय घेवून जनतेला आव्हान केले की अत्यावश्यक सेवाच सुरू राहील खाजगी वाहने बंद राहील त्यामुळे सर्वानी आपल्या घरीच रहा बाहेर निघू नका व प्रशासनाला मदत करा.

Previous articleकोरोनाची एकीकडे भिती वाढली तर दुसरीकडे सुखद बातमी !
Next articleमोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाला लागले ग्रहण ? कोरोना व्हायरसच्या भितीने २१ दिवसांच्या संचारबंदीतून देशाच्या अर्थव्यवस्थेचा होणार बट्ट्याबोळ ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here