नायगाव वेकोली कोळसा खाणीत तीन कर्मचार्यांना दिला निरोप!
भद्रावती,
प्रत्येक खाणीतील आमत्रणांनाचा सेवनिवृत्तीपर्यत कामाचा दीर्घनुभव येतो त्या अनुभवाचा फायदा नवोदित कामगारांना घेता येतो त्यामुळे एखादा कामगार सेवानिवृत्त झाल्यास त्या क्षेत्राला त्याचा थोडाफार तोटा सहावा करावा लागतो. मात्र त्यांचा आदर्श त्या क्षेत्रासाठी सैदव कायम राहतो असे मत वणी वेकोली उपक्षेत्रातील नायगाव भूतल कोळसा खाणीचे प्रबंधक आर के आचार्य यांनी व्यक्त केले.
खाणीतील चंद्रभान बावणे,आनंद उरकुडे, व जसवंत सिंग हे खान कामगार 30 जूनला सेवानिवृत्त झाले त्याप्रसंगी पार पडलेले निरोप समारंभात ते बोलत होते.यावेळी आर.के.आचार्य,सुरक्षा अधिकारी पोचपोर उत्खनन अधिकारी पाटील,आर के शर्मा,संजय अळमेघ,विजय कुमार,बी आर आवारी,याही मान्यवर उपस्थित होते. यावेळी तिन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह व प्रमानपत्र देऊन सम्मान करण्यात आला.
कामगार नेते श्रीकांत माहुलकर व एस जानवे यांनी त्यांचा उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन व आभार नारायन जांभुळकर यांनी मानले कर्मचाऱ्यांचा यशाकरिता सुनील बिपटे,संखेत खोकले,अरुण मेश्राम,एस आर किनीकर यांनीही सहकार्य केले.