निलेश बरगंटीवार ह्यासह पांडे व केवट ह्या दारू तस्करांची दारूविक्री खुलेआम कशी?ठाणेदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
पोलीस पंचनामा भाग – ६
गडचांदुर प्रतिनिधी :-
गडचांदुर पोलीस स्टेशन अंतर्गत पहिल्यांदाच अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला मोठ्या दारू साठ्यासह पकडण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती असून उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांच्या देखरेखीखाली ही पहिली मोठी कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे, मात्र पकडलेली दारू नेमकी किती होती याबाबत दोन प्रकारच्या चर्चा असून कोणी म्हणताय की तब्बल 500 पेट्या दारू पकडली तर कोणी म्हणताय की 257 दारू पेटी चा साठा पकडला, खरं तर गडचांदुर पोलीस स्टेशन मधे केव्हाही दारूसाठा पकडला तर पोलीस रेकॉर्ड नुसार तो कमी दाखविल्या जातो अर्थात कमी दारूसाठा दाखवून उर्वरित दारूसाठा नेमका जातो कुठे ? याचे सोर्स सर्वाना एक दिवस कळेलच, कारण आजपर्यंत एवढ्या दारूसाठ्याचे निस्तारन (नायनाट) करण्यात आले त्यात किती बियर च्या बॉटल होत्या किंव्हा किती विदेशी बम्परच्या बॉटल होत्या ? हा संशोधनाचा विषय आहे असून स्वस्त देशी विदेशी दारूच्या बॉटलचाच नायनाट केल्या जात असल्याची चर्चा आहे.
गडचांदुर ठाणेदार भारती यांचे अवैध दारू तस्करांसोबत असलेले अर्थपूर्ण सबंध हे जगजाहीर असताना जीवती तालुक्यात नवे अवैध दारू व्यवसायी ज्यांच्यावर ठाणेदार भारती यांचा आशीर्वाद नाही त्यामुळे त्यांची दारू पकडणे आवश्यकच होते त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेत्रुत्वात उपपोलिस निरीक्षक युवराज पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी ट्रक वाहन क्र एम एच ४0, B G 6947 या वाहनातून 257 पेटी देशी दारू ने भरलेल्या सुपर सानिक राकेट संत्रा कंपनी सिलबंद निपा रु. 2570000, किमतीची दारू ट्रकवाहनासह पकडण्यात आली. यामधे वाहन चालक राहुल अंबादास पहूनकर याला रंगेहाथ पकडले तर दोन आरोपी फरार झाले. या सर्वावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा ,सहकलम १८८,65(A) ६५(E)अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पण होलसेल दारू तस्कर निलेश बरगंटीवार ह्यासह पांडे व केवट ह्या दारू तस्करांची दारूविक्री जोमात असताना व मागील अनेक वर्षापासून गडचांदूर पोलीस स्टेशन मधे जणू दत्तक असलेल्या पोलीस कर्मचारी अंसारी यांनी निलेश बरगंटीवार ह्यासह पांडे व केवट ह्या दारू तस्करांची दारू पकडण्यासाठी धडपड केल्यानंतर सुद्धा त्यांना उलट त्यांची अवैध दारू ठरलेल्या ठिकाणी पोहचवुन देण्याची जबाबदारी मिळाली कशी ? हा खरा प्रश्न चर्चिला जात असून या प्रकरणात अंसारी यांनी आपला खिसा गरम केल्याची पण चर्चा आहे, एकूणच गडचांदूर पोलीस स्टेशन मधे ठाणेदार भारती यांच्या भ्रष्ट नितिने अवैध धंद्याना ऊत आला असताना केवळ नवख्या दारू तस्करांना पकडून दारू तस्करांवर कारवाई केल्याचा फार्स दाखवून हप्ता मिळणाऱ्या दारू तस्करांना खुली सूट दिली जात असल्याची चर्चा आहे.