Home चंद्रपूर दुःखद घटना :- रंगपंचमीच्या दिवशी ऋषिकेश कोतपल्लीवार या तरुणाचा नदीत बुडून मृतू.

दुःखद घटना :- रंगपंचमीच्या दिवशी ऋषिकेश कोतपल्लीवार या तरुणाचा नदीत बुडून मृतू.

 

मित्रांनी बोलवले म्हणून आंघोळीला गेलेल्या ऋषिकेशचा मृतदेहच आला घरी.

बल्लारपूर प्रतिनिधी :-

होळीचा सण म्हणजे विविध रंगात रंगून आनंद व्यक्त करण्याचा दिवस पण आयुष्याच्या वखारीत नेमके काय साठवले आहे हे कधी कधी कळत नाही आणि मग आनंदाच्या वातावरणात दुःखाचा डोंगर कोसळतो, असाच डोंगर कोसळला तो बल्लारपूर शहरातील कोतपल्लीवार कुटुंबावर. काल होळी व धुलीवंदनाच्या नीमित्ताने रंग खेळून घरी परतलेला व आराम करीत असतांना ऋषिकेशला
मित्राचा फोन आला व मित्राच्या प्रेमाखातर तो घराबाहेर पडला तो कधीही परत न येण्यासाठीच मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश संजय कोतपल्लीवार हा रंग खेळून घरी परतला व आराम करू लागला तोच एका मित्राच्या फोन आला की मित्र व सवंगडी यांनी वर्धा नदीवर अंघोळ करण्याचा बेत आखला व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या पाणी टंकी असलेल्या घाटावर दुपारी 2 : 00 वाजताच्या अंघोळी करिता वर्धा नदीत मित्रासह तो उतरला तोच त्याचा तोल जाऊन वर्धा नदीत बुडू लागला, मित्रांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ऋषिकेश संजय कोतपल्लीवार नदीत बुडाला या घटनेचे वृत्त मित्राने मृतकाच्या वडिलांना सांगताच वडिलांनी क्षणाचीही वेळ न दवळता याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनेची गँभीर दखल घेत त्वरित घटनास्थळ गातगले व सायंकाळी 6:00 वाजताच्या सुमारास ऋषिकेश याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे उत्तरीय तपासणी करीता दाखल केले व पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here