Home चंद्रपूर चिंताजनक :- 13 कोरोना बाधितांच्या मृत्यूसह 24 तासात 1235 पॉझिटिव्ह रुग्ण...

चिंताजनक :- 13 कोरोना बाधितांच्या मृत्यूसह 24 तासात 1235 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले.

 

जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर्स अपुरे काही रुग्णालयात बेड सुद्धा मिळेना?

कोरोना अपडेट  :-

जिल्ह्यात मागील 24 तासात 1235 कोरोना बाधित रुग्ण वाढले असून सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात सुद्धा व्हेंटिलेटर्स कमी पडत आहे नव्हे नवीन रुग्णांना व्हेंटिलेटर्स मिळणे कठीण झाले आहे इतकेच नव्हे तर काही खाजगी रुग्णालयात बेड सुद्धा मिळत नाही अशा परिस्थितीत येणाऱ्या काही दिवसात कोरोना रुग्णांचे प्राण व्हेंटिलेटर्स अभावी होण्याची भीती आहे त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 36 हजार 748 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 28 हजार 780 झाली आहे. सध्या 7439 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 12 हजार 440 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 69 हजार 973 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 35 वर्षीय व 45 वर्षीय पुरुष तसेच श्रीराम वार्ड येथील 70 वर्षीय महिला, झाकीर हुसेन वार्ड बल्लारपूर येथील 55 वर्षीय पुरुष, बामनी बुधोली बल्लारपूर येथील 72 वर्षीय पुरुष, मूऊ येथील 46 वर्षीय पुरुष, वरोरा शहरातील 45 वर्षीय पुरुष, भिसी चिमूर येथील 45 वर्षीय पुरुष, चिमूर येथील 55 वर्षीय महिला, जिवती येथील 45 वर्षीय महिला, अहेरी येथील 60 वर्षीय महिला, जुमाठा वार्ड वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष, केमिकल वार्ड, घुग्गुस येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 529 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 483, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1235 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 302, चंद्रपूर तालुका 87, बल्लारपूर 83, भद्रावती 100, ब्रम्हपुरी 98, नागभिड 39, सिंदेवाही 23, मूल 22, सावली आठ , पोंभुर्णा सहा, गोंडपिपरी चार, राजूरा 30, चिमूर 152, वरोरा 219, कोरपना 23, जीवती 17 व इतर ठिकाणच्या 22 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Previous articleमद्यपिना खुशखबर:- आता लॉक डाऊन च्या काळात घरपोच मद्य मिळणार?
Next articleराजभाषा :- राजसाहेबांच्या खळळळखट्याक ह्या शास्त्राचे खरे ब्रैंड अॅम्बेसीडर ठरले अविनाश जाधव ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here