Home क्राईम स्टोरी अबब, सोनू नावाच्या तरुणीने केले तब्बल १३ तरूणाशी लग्न.

अबब, सोनू नावाच्या तरुणीने केले तब्बल १३ तरूणाशी लग्न.

 

एका तरुणांच्या फसवणुकीच्या तक्रारीवरून १३ वे लग्न सुरू असतांना सोनूला पोलीसांनी केली अटक.

न्यूज नेटवर्क :–

आजपर्यंत एका व्यकीने अनेक महिलांसोबत लग्न करून फसवणूक केल्याची गोष्ट घडली आहे पण एका स्त्रीने तब्बल १३ युवकांसोबत लग्न केल्याची बहुतेक पहिलीच घटना असेल. एकीकडे भ्रूण हत्येमुळे देशात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लग्नाळू मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती जवळपास सगळ्याच समाजात आहे. त्यामुळे अनेक प्रयत्ना नंतर ही मुलांचे लग्न जमत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आता मध्यस्थांची मदत घेणे सुरू आहे. पण मध्यस्थांनी मुलांच्या कुटुंबाची अडचण पाहून याला आपला व्यवसाय बनवून घेतला आहे आणि एकाच मुलीचे अनेक मुलांशी लग्न लावून देऊन यांनी बक्कळ पैसा जमा करण्याचा धंदा सुरू केला आहे. ही मुलगी एक किंवा दोनच दिवस कथित सासुरवाडीत राहते. आणि नंतर लग्नात आलेले दागिने आणि नगदी पैसे घेऊन रफुचक्कर होते. मुलगा आणि मुलांचे कुटुंब समाजात बदनामीच्या भीतीपोटी गपगुमान बसतात. याच गोष्टींमुळे अश्या लोकांची हिंमत वाढली आहे. खान्देश पोलिसांनी सोनू शिंदे नामक तरुणीला अटक केली आहे. सोनुने तब्बल १३ मुलांना मूर्ख बनवल्याची बाब समोर आली आहे. सोनू शिंदे ही एकटी नसून तिच्या सोबत एक गॅंग कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
सोनू शिंदे ही टोळी खरंतर हिंगोली आणि अकोला येथील असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. वेगवेगळ्या तरुणांसोबत लग्न जुळवण्यासाठी ही टोळी विविध शहरांमधील दलालांची मदत घ्यायची. यावेळी तिने नंदुरबारात एका कुटुंबाला फसवलं तेव्हा तिला या कामात औरंगाबादच्या एका दलालाने मदत केल्याचं उघड झालं आहे. हा सगळा प्रकार नेमका कसा उघड झाला, ही टोळी नेमकी कशी पकडली गेली, याबाबतची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

नंदुरबारच्या एका कुटुंबाला फसवलं

सोनू शिंदे या तरुणीने दोन आठवड्यांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या मंदाने येथील एका तरुणाशी लग्न केलं. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. लग्नाच्या आठवणी आयुष्यभर जोपासल्या जातात. त्यामुळे साहजिकच नवरदेव आनंदात होता. लग्नासाठी वधू पक्षाकडून काही लाखांची मागणी झाली होती. मुलाच्या कुटुंबियांनी वधू पक्षाला पैसेही दिले. पण लग्नानंतर सत्यानाश झाला. नवी नवरी नांदलीच नाही. ती पळून गेली.

सोनू शिंदे टोळी विरोधात पोलिसात तक्रार.

घरात आलेली नवी नवरी अचानक पळून गेल्यानंतर संबंधित कुटुंबाला मोठा झटका बसला. आपण लुबाडलो गेलो याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी संबंधित घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

कसा केला पोलिसांनी तपास?

पोलिसांचा तपास सुरु असतानाच त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. पोलिसांना सोनू शिंदे आता शिंदखेडा तालुक्यातील एका तरुणाशी 13 वं लग्न करणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस आपला तपास करत असल्याचा सुगाला या टोळीला लागला. त्यांनी थेट लग्नाचं ठिकाणच बदललं. लग्न नंतर अमळनेर तालुकत्यातील ग्रामीण भागात ठरवण्यात आलं. पण कानून के हाथ लंबे होते, अशा म्हणीप्रमाणे पोलिसांना त्याबाबत माहिती मिळालीच.

वधू झालेल्या सोनूला पोलिसांकडून भर मंडपात अटक.

पोलिसांनी अगदीच वेळेवर म्हणजे लग्न लागणार होतंच त्याआधीच लग्न मंडपातून सोनू शिंदे टोळीला जेरबंद केलं. पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच नवरीची आई आणि भाऊ पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पण वधू सोनू पकडली गेलीय. पोलिसांच्या या कारवाईला थोडा जरी वेळ झाला असता तर आणखी एक कुटुंब सोनू शिंदे टोळीच्या जाळ्यात अडकलं असतं. या टोळीने खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अनेकांकडून लग्न लावून पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे भविष्यातील अनेकांची फसवणूक टळली आहे

Previous articleलक्षवेधक :- कोरोनाची लस टोचून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांनी एकदा ही बातमी वाचाच.
Next articleमार्मिक :- कोरोनाच्या संकट काळात रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या त्या गिधाडांना कोण सांगणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here