Home मुंबई शैक्षणिक :- राज्यातील सर्व शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद?

शैक्षणिक :- राज्यातील सर्व शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद?

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने राज्य सरकारचा निर्णय.

मुंबई :-

राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर व कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव बघता महाराष्ट्र सरकारने पहिली ते आठवी इयत्ता (1 ली ते 8 वी) पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसांपासून राज्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. याशिवाय राज्यात ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणेही वाढताना दिसत आहेत. मुलांचे आरोग्य लक्षात घेऊन उद्धव ठाकरे सरकारने 31 जानेवारीपर्यंत शाळा बंद केल्या आहेत. मात्र, या काळात मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार आहे.

मुंबईतही शाळा बंद

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान केवळ 10वी आणि 12वीच्या वर्गातच अभ्यास सुरू राहणार आहेत. इयत्ता 11वीचा अभ्यासही बंद राहणार, फक्त ऑनलाइन वर्ग चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढीने जनजीवन ठप्प होणार? 

रविवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे 11 हजार 877 नवीन रुग्ण आढळले, जे एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा 2 हजार 707 अधिक आहेत आणि ओमिक्रॉनचे 50 रुग्ण आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने एका बुलेटिनमध्ये म्हटले आहे की महाराष्ट्रातही नऊ रुग्णांचा मृत्यू झाला असून यासह मृतांची संख्या 1 लाख 41 हजार 542 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात आता 42 हजार 24 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. संसर्गाच्या 11 हजार 877 रुग्णांपैकी मुंबईत 7 हजार 792 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोना च्या वाढत्या संख्येने सामान्य जनजीवन धोक्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here