Home महाराष्ट्र खळबळजनक :- राज्य सरकारच्या कुटनीतीमुळे माजी मंत्री बच्चू कडू सप्टेंबर पर्यंत तुरुंगात...

खळबळजनक :- राज्य सरकारच्या कुटनीतीमुळे माजी मंत्री बच्चू कडू सप्टेंबर पर्यंत तुरुंगात जाणार?

एका वर्षाच्या सजेसाठी बच्चू कडूना अपात्र ठरवलं तर कोकाटेना दोन वर्ष सजा पण मंत्रिपद सुद्धा साबूत, हे कसलं राजकारणं?जनतेत आक्रोश?

न्यूज नेटवर्क:

सत्तेचा दुरुपयोग करून फडणवीस सरकार काय खेळ करताहेत हे अख्ख राज्य बघत आहें, शेतकऱ्यांचा सातबारा “कोरा कोरा करु”अशी विधानसभा निवडणूकीच्या प्रचार सभेत घसा कोरडा होत पर्यंत किंचाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा “फ” उच्चारायला तयार नाही, दरम्यान माजी मंत्री बच्चू कडू यांनी आमरण उपोषण चे हत्यार उपासल्यनंतर आता समिती नेमण्यात येणार असा फुसका बार सोडून बच्चू कडूचं आंदोलन मागे घेण्यास भाग पाडलं, पण “लबाडाच आवतन जेवल्यावरच खरं.” ह्या उक्तीप्रमाणे हे भाजप धर्जिन सरकार राज्यातील जनतेसोबत लबाडी करत आहें, निवडनुका आल्या की मोठामोठ्या घोषणा करायच्या आणि सत्ता आली की मग तो मी नव्हेच या भूमिकेत आपले बयान बदलायचे हा कपटी खेळ फडणवीस सरकार खेळत आहें, आता शेतकऱ्यांसाठी लढणारा एकमेव योद्धा बच्चू कडू यांना अशा चक्रव्युहात पकडून त्यांचेवर जुन्या प्रकरणाचा संदर्भ घेऊन सप्टेंबर पर्यंत जेल मध्ये पाठविण्याचे कपटी छडयंत्र सत्ताधारी आमदार आणि काही अधिकारी यांच्या मार्फत होणार असल्याचा गौप्यस्फ़ोट खुद्द बच्चू कडू यांनी केल्यामुळे या राज्यात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कुणी लढावं नाही का? असा प्रश्न आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहें.

राज्याच्या एका मुख्य माणसाच्या दालनात अमरावतीचे 2 आमदार भेटले. यावेळी त्यांच्यात मला येत्या सप्टेंबरपर्यंत तुरुंगात टाकण्याचा डाव राज्य सरकार कडून रचण्यात आला असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहें.दरम्यान बच्चू कडू यांनी नुकतेच कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यांनी सलग 7 दिवस हे उपोषण केले. त्यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईनंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. ते आता 2 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचे नाव न घेता त्याच्यावर आपल्याला तुरुंगात डांबण्याचा आरोप केला आहे.

काय आहें प्रकार? कोण करणार बंदोबस्त?

बच्चू कडू सोमवारी एका रुग्णालयात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्याच्या एका मुख्य माणसाच्या दालनात अमरावती जिल्ह्यातील दोन आमदार भेटले. त्यांच्यात चर्चा झाली. तिथे एक अधिकारीही उपस्थित होता. त्या अधिकाऱ्याने सांगितले की, बच्चू कडू सप्टेबरपर्यंत तुरुंगात जातील याची व्यवस्था करा. तुमच्या स्तरावर देखील अन् प्रशासकीय स्तरावर कशा अडचणी येतील, त्या शोधून काढा. त्यांचा बंदोबस्त करा

दरम्यान मी आंदोलनाला बसलो त्याच्या अगोदरपासूनच माझ्यावर प्रचंड दबाव होता. तसा तो आणला जात होता. अमरावती सहकारी बँकेतील माझे सहकारी संचालक मला फार काही न बोलण्याचा सल्ला देत होते. मी बोललो तर अडचणी निर्माण होतील, असे ते म्हणत होते. या दबावाची सुरूवात झाली होती. ते राजकीयदृष्ट्या असेच करतात. त्यात काहीच नवल नाही. हे त्याच्याकडूच अपेक्षित आहे. पण माझ्या आईने मला भगतसिंगांसारखे सर्वसामान्य लोकांसाठी संघर्ष करण्याची शिकवण दिली. त्यानुसार आम्ही लढलो व टिकलो. ही आमची परीक्षा आहे. आमचे सत्व तपासण्याचे दिवस आहेत. या परीक्षेत उजळून आम्ही बाहेर पडू, असेही ते म्हणाले.

बच्चू कडूंना अपात्र तर मग कोकाटेना का नाही?

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ज्यांनी शेतकऱ्यावर अनेक उपरोधीक टोमणे मारून आपल्या कृषी मंत्री पदाची गरिमा घालवली त्यांना एका धोखाधडी प्रकरणी 2 वर्षाची सजा काही महिन्यापूर्वी न्यायालयाने थोठावली होती, त्यावेळी आता कोकाटे यांचे कृषी मंत्री पद जाणारं आणि यांची आमदारकी पण जाणार अशी राज्यात चर्चा होती, मात्र सत्ताधारी आमदार खासदार आणि मंत्र्यांना जणू नवसंजीवनी बुटी दिली असल्याने त्यांचे पद जातं नाही मात्र विरोधी पक्षाच्या आमदार खासदार यांच्या कडून काही चुकलं तर लगेच त्यांना सत्तेचा दुरुपयोग करून अपात्र घोषित करण्यात येते, अशीच कारवाई शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या बच्चू कडू यांच्यावर झाली असून एका न्यायालयाने बच्चू कडू यांच्यावर एका वर्षाच्या सजा सुनावली असता तो संदर्भ घेत विभागीय सहनिबंधक यांनी त्यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे संचालक पद बरखास्त करण्यात आले, ही सत्ताधारी राज्य सरकार च्या भाजप ची खेळी असून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनुकामध्ये याचा मोठा धक्का सत्ताधारी महायुती सरकारला बसणारं हे निश्चित आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here