Home Breaking News वादळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करा सुधीर मुनगंटीवार

वादळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करा सुधीर मुनगंटीवार

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश

चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे, या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी ,नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. यांसदर्भात नुकसानीचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावे व नुकसान भरपाई तात्काळ अदा करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवार, २२ एप्रिल २०२३ रोजी तातडीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Previous article सामाजिक, शैक्षणिक, अन्याय विरुद्ध लड़ने वाले सर्व सामान्य लोगो का संघटन “सम्राट फाउंडेशन भारत” के 
Next articleरुग्णमित्र गजू कुबडे यांचे उद्या प्रायश्चित्त आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here