१७ नोव्हेंबर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त तमाम हिंदू बांधवांच्या भावना,
विशेष बातमीपत्र
१७ नोव्हेंबर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्रात सगळीकडे त्यांना विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहिली जात असतानाच दुसरीकडे त्यांच्या राजकीय अस्तित्वाची पोकळी कोण भरून काढेल याबाबत सुद्धा चर्चा झाल्या कारण वाघांना” माणसासारखं वागायला शिकवणारी आपण अनेक माणसं पाहिली असतील पण बंदुकीच्या धाकाशिवाय माणसांना वाघासारखं” जगायला शिकवणारे हिंदू ह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच होते असे आपण म्हणतो पण त्यांच्या नंतर फक्त मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा चालवीत असल्याच्या प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त तमाम हिंदू बांधवांनी व्यक्त केल्या. कारण एकेकाळी देश विदेशातील उद्दोगपती व राजकारणी हे मातोश्री वर बाळासाहेबांना भेटायला जायचे एवढेच नव्हे तर चित्रपट ऊद्दोग असो नाटक कलाकार असो की विविध संघटना चे पदाधिकारी असो सगळे बाळासाहेबांकडे आपली गार्हाणी घेवून यायचे आता ते सगळे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या क्रुष्णकुंज वर जातात जेंव्हा की बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण त्यांच्याकडे लोक जात नाही तर ते राजसाहेब ठाकरे यांच्या क्रुष्णकुंज या बंगल्यावर जातात त्यामुळे महाराष्ट्राचे खरे सत्ता केंद्र हे मातोश्री नाही तर क्रुष्णकुंज आहे असे चित्र आहे, त्यामुळे बाळासाहेबांचा खरा राजकीय वारसा हे राजसाहेब ठाकरे चालवीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.