आधी औरंगाबादचे नामांतर होऊ देणार नसल्याच्या वल्गना नंतर काही तासातच माघार.
राजकीय वार्ता :-
औरंगाबादच्या नामांतरचा मुद्दा सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धरून लावला असताना आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे मात्र याला काँग्रेसने विरोध केला आहे. नामांतरावरून काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद समोर आल्याने मनसे व भाजपच्या हाती आयतं कोलीत मिळालं. या मुद्यावरुन मनसे व भाजप शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजपसोबत असलेल्या आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी या मागणीला विरोध करणारे ट्विट केले व रामदास आठवले यांनी केलेल्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली असताना काही वेळातच रामदास आठवले यांनी ते ट्विट आपल्या ट्विटरवरुन डिलीट करत नामांतराच्या मुद्यावर पडदा टाकला. रामदास आठवले हे भाजपचे पित्तु आहे व भाजप नेत्यानी त्यांना या मुद्यावरून धमकावले असेल आणि त्यामूळेच सत्तेसाठी लाचार असणाऱ्या रामदास आठवले यांनी आपली सपशेल माघार घेतली आहे
येत्या काळात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर शहराचे नाव बदलण्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे शिवसेना सत्तेत असताना सुद्धा महाविकास आघाडीतील काँग्रेसने याला विरोध केला आहे. यावरुन भाजपाने शिवसेनेवर शरसंधान साधले असून निवडणुकीपुरतीच शिवसेना ही भूमिका घेत असल्याचा आरोप करत आत्ताही असचं सुरु असल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान, औरंगाबादचे नाव तेच राहायला हवं. कुणीही ते नाव बदलण्याचा प्रयत्न करु नये. वर्षानुवर्षे हेच नाव प्रचलित आहे, तेच राहिले पाहिजे. कुणी नाव बदलण्याचा प्रयत्न केला तर आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आठवले यांनी ट्विट करुन दिला होता. भाजपच्या मागणीविरोधात भूमिका घेतल्याने नवा राजकीय ट्वीस्ट निर्माण झाला होता. मात्र काही वेळातच रामदास आठवले यांनी आपलं ट्विट डिलीट केलं. यावरुन आठवले यांची राजकीय लाचारी समोर आल्याने आधी विरोध केला नंतर पळ काढल्याची चर्चा रंगू लागली आहे.