Home गडचांदूर इशारा :- पूर्वीच्या कामगारांना घेतल्याशिवाय दालमिया भारत सिमेंट उद्योग सुरू होऊ देणार...

इशारा :- पूर्वीच्या कामगारांना घेतल्याशिवाय दालमिया भारत सिमेंट उद्योग सुरू होऊ देणार नाही?

 

पुर्वीचे कामगार एकवटले, कंपनी व्यवस्थापनाला दिला इशारा,

प्रमोद गिरडकर कोरपना:-

कोरपना तालुक्यातील नारंडा येथील मुरली सिमेंट उद्योगात बारा वर्ष कामगारांनी काम केले मात्र हा उद्योग बंद पडल्याने येथील कामगार बेरोजगार झाले होते. त्या कालावधीतील मजुरांना कामाचा मोबदला कंपनीने दिला नाही, यासाठी कामगारांचा संघर्ष बरेच वर्षे चालला त्यानंतर या कंपनीचे अधिग्रहण व हस्तांतर दालमिया भारत या सिमेंट उद्योगाला देण्यात आले आता पूर्वीच्या कामगारांना समावेश केल्या जाईल अशा प्रकारचा शब्द कंपनीने दिला मात्र कंपनीने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकाम व सिमेंट उत्पादनाला सुरुवात केली तरीही हजारो कामगारांचा प्रश्न निकाली न काढता व स्थानिक मजुरांना कामावर रुजू करून न घेता व थकबाकी देयके न देता कंपनीने सिमेंट उत्पादन करून विक्री सुरू केली आहे. आता कामगारांचा प्रश्न निकाली न लागल्याने संपूर्ण कामगार संघटना एकवटल्या तरीही कंपनी व्यवस्थापन स्थानिक कामगार यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठेकेदारामार्फत परराज्यातील मजुरांचा भरणा करून स्थानिक कामगारांना त्यांच्या हक्का पासून वंचित करीत आहे.त्यामुळे कामगारांमधे तीव्र असंतोष निर्माण होऊन दिनांक ६ जुलै पासून कामगारांनी सत्याग्रह आंदोलन कुटुंबासह सुरू केले आहे. मात्र प्रशासन व व्यवस्थापन या बाबीकडे दुर्लक्ष करून सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशांचे पालन न करता कामगार संघटनाकडे दुर्लक्ष केल्याने कामगारांचे प्रश्न रखडले आहे.

मुरली सिमेंटच्या 2015 पर्यंत कामगारांचे थकित मजुरी लेखी आश्वासन देऊनही अजूनही दिले नसल्याने पाचशे कामगारांना मानसिक त्रास होत आहे जे पूर्वी कामावर होते अश्या सर्व कंत्राटी कामगार तसेच पॅकिंग प्लांट व कायमस्वरूपी कामावर असलेल्या कामगारांना न्याय न देता नवीन परप्रांतीय मजुरांना २८० ते ३५० रुपये मजुरीवर कॉन्ट्रॅक्टदार मार्फत कामावर घेतल्या जात आहे, यामुळे स्थानिक मजुरांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झाली असून व्हेज बोर्ड नुसार स्थानिक मजुरांना देयके दिल्या जात नाही तसेच जे मजूर कामावर आहेत त्यांचा पीएफ कपात केल्या जात नसल्याने मजूरांचे भविष्य धोक्यात आले आहे, काही कारणास्तव मजूर एक दोन दिवस कामावर गेला नाही तर त्यांना कामावर काढून देण्याची धमकी कॉन्ट्रॅक्टदार मार्फत दिल्या जाते यामुळे पुन्हा असंतोष वाढला असून मजुरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे जिल्हा प्रशासनाने स्थानिक कामगारांच्या मागणीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कंपनी व्यवस्थापन व कामगारांची संयुक्त बैठक घेऊन कामगाराची मागणी व समस्य सोडवण्याचा प्रयत्न करावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद आबिद अली यांनी या मंडपाला भेट देऊन कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवावे पूर्वीच्या कामगारांना समावेश करावा अन्यथा बाहेरच्या मजुरांना आणून काम करण्याचा प्रयत्न निषेधार्थ असल्याने स्थानिक कामगार रस्त्यावर उतरतील व आपल्या हक्काची लढाई लढल्याशिवाय थांबणार नाही कामगारांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक मजुरांना कामावर रुजू करावे अशी मागणी केली असून लवकरच कामगार मेळावा नारंडा येथे घेऊन व प्रशासनासोबत बैठकीची मागणी करून कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्या जाईल अशी माहिती कामगार नेते रमेश वेटी गजानन खाडे गुरुदास वराते यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here