Home चंद्रपूर सावधान :- दीपक आसावानी करतो नवनवीन बायकांशी व मुलीशी ओळख आणि करतो...

सावधान :- दीपक आसावानी करतो नवनवीन बायकांशी व मुलीशी ओळख आणि करतो प्रेमाचे नाटक?

 

दोन बायकांसोबत लग्नाचे प्रमाणपत्र असल्याने दीपक आसवानी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

दीपक आसवानी हा प्रेमाचे नाटक करून अनेक महिला व मुलींना उल्लू बनवून त्यांच्याकडून पैसे उकळतो व अय्याशी करतो अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा चंद्रपूर शहरातील एका आदिवासी महिलेने रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार दिली, त्या तक्रारीत म्हटले की त्या विवाहित महिलेशी विवाह करून त्या पत्नीच्या घरी तो तब्बल 4 वर्ष काढल्यानंतर आता तो दुसऱ्या महीलेसोबत अय्याशी करतोय. दरम्यान आता त्या महिलेने दीपक आसावानी ह्या आपल्या भामटय़ां पतीचे कृष्णकृत्य शोधून काढण्याचा सपाटा लावला आहे, त्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर येणार असून दीपक आसवानी यांचे नेमके किती महिला व मुलींशी अनैतिक सबंध आहे त्याचा पाढाच ती पीडित महिला प्रसारमाध्यमांसमोर सांगणार आहे.

रामनगर पोलीस स्टेशन मधे दिलेल्या तक्रारीत त्या पीडित महिलेने म्हटले आहे की दीपक आसवानी यांनी सदर आदिवासी महिलेची फसवणूक करून तिचे शारीरिक, मानसिक, आर्थिक व भावनीक शोषण केले आणि त्याच्यासोबत असलेले त्याचे मित्र स्वप्नील केलझरकर हे सुद्धा पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करत होते. दरम्यान पीडित महिलेकडुन पैशाची वेळोवेळी मागणी व त्याचे दुसऱ्या अनेक महिला आणि मुलीसोबत असलेले अनैतिक सबंध यामुळे त्रस्त झालेल्या त्या महिलेने पुन्हा कुणी महिला व मुली बळी पडू नये म्हणून पोलीस तक्रार दिली असल्याची माहिती आहे.

दोन दोन महिलांशी लग्नाचे प्रमाणपत्र ? यामागे काय आहे राज?

पहिली पत्नीशी लग्नाचे विवाह प्रमाणपत्र व रजिस्टर मैरेज झाले असताना दुसऱ्या महिलेसोबत सुद्धा लग्नाचे प्रमाणपत्र करण्याचे नेमके कारण काय? याचे राज आता खुलले असून आपल्यावर बलात्काराचा आरोप लागू नये आणि कौटुंबिक हिंसाचार हा गुन्हा मोठा नसतो म्हणून अशी शक्कल दीपक आसवानी यांनी लढवली असल्याची माहिती आहे. परंतु पहिल्या पत्नीने दीपक आसवानी याच्या विरोधात रामनगरच्या पोलीस स्टेशन मधे दिलेल्या तक्रारीत त्याचेवर भा.दं.वि. कलम 498ए. 417, 494, 34 तसेच अनुसुचित जाति आणि अनुसुचित जमाति (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 च्या कलम 3(1)(आर). 3(1)(5). 3(2)(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती परंतु पोलिसांनी केवळ 498A, 294,506,34 अन्वये गुन्हे दाखल केले

आता पोलीस स्टेशन मधून जामीनपात्र गुन्हे दाखल असल्याने दीपक आसवानी हा आपला पती सुटेल व पुन्हा अनेक महिला व मुलींच्या जिंदगी तो बरबाद करेल या उद्देशाने पीडित महिलेने त्याच्या सर्व ठिकाणचा शोध घेणे सुरू केले आहे. व याबाबत ती महिला प्रसारमाध्यमांना पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडणार असल्याची माहिती आहे. आता जिल्ह्यातील महिला व मुलींनी अशा भामटय़ां प्रेमवीरा पासून सावधान राहावे असे सर्वसामान्य जागरूक नागरिक आवाहन करीत आहे.

Previous articleआंदोलन :- स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून किशोर डुकरे यांनी घातले पाचशे मीटर लोटांगण.
Next articleतक्रार :- अवैद्य रेती साठा तात्काळ जप्त करून साठवणूक दारांवर गुन्हे दाखल करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here