Home Breaking News आई-वडिलांना घरातून काढणे पडेल महागात बल्लारपूर न्यायालयातील न्यायाधीश अनुपम एस. शर्मा यांनी...

आई-वडिलांना घरातून काढणे पडेल महागात बल्लारपूर न्यायालयातील न्यायाधीश अनुपम एस. शर्मा यांनी दिला निर्णय

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

बल्लारपूर  :-  येथील दीनदयाल वॉर्डातील रहिवासी जानकीदेवी लक्ष्मण मांझी यांच्या याचिकेवर ३१ ऑगस्टला बल्लारपूर न्यायालयाने सुनावणी केली. त्यांची सून व मुलाला वडिलांचे राहते घर खाली करून दर महिना चार हजार रुपये आई- वडिलांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बल्लारपूर पेपर मिलमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर लक्ष्मण मांझी यांनी पंडित दीनदयाळ वॉर्डात घर विकत घेतले व पत्नी तसेच आपला मुलगा आणि सुनेसह राहू लागले; परंतु, काही दिवसानंतर मुलगा व सुनेने त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले.

हा त्रास असहनीय झाल्यानंतर जानकीदेवी मांझी यांनी महिला अधिनियमचे कलम १९ चे अंतर्गत अँड. सुनील पुरी यांच्या माध्यमातून मुलगा जितेंद्र मांझी व सून मीना मांझी यांच्या विरोधात बल्लारपूर न्यायालयात याचिका दाखल केली.

न्यायाधीश अनुपम एस. शर्मा यांनी निर्णय देताना मुलगा व सुनेला दोन महिन्यांच्या आत घर खाली करण्याचा आदेश दिला व मांझीचा मुलगा जितेंद्र याला दर महिना चार हजार गुजराण भत्ता आई वडिलांना देण्याचा आदेश दिला. मुलगा व सून यांना त्यांच्या घरी न जाण्याचे आदेश दिले. वयोवृद्ध जानकीदेवी यांची पैरवी अॅड. सुनील पुरी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here