Home राष्ट्रीय दखलपात्र :- पत्रकारांना आदराने बोला अन्यथा गुन्हा दाखल करणार

दखलपात्र :- पत्रकारांना आदराने बोला अन्यथा गुन्हा दाखल करणार

भारताचे माजी न्यायाधीश तथा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांचा इशारा.

न्यूज नेटवर्क:

हायकोर्टाच्या टिकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केले आहे की, पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांना ५० हजाराचा दंड आणि पत्रकाराशी गैरवर्तन करणान्याला तीन वर्षांचा तुरंगवास होऊ शकतो. पत्रकाराला धमकी देणाऱ्याला आतमध्ये तुरुंगात पाठवण्यात येईल, पत्रकारांना धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही. कुठल्याही बातमी संदर्भात पत्रकारांचा आदर करा आणि पत्रकारांशी आदराने बोला. नाही तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल गैरवर्तन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर एफआयआर नोंदवला जाईल अन्यथा एसएसपीएम कारवाई केली जाईल, पत्रकार जमावाचा भाग नाहीत हीच बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कडेय काटजू यांनी राज्य सरकारला ताकीद दिली असून पत्रकारांशी गैरवर्तन करू नये अशा सूचना दिल्या आहेत.

कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदारोळ झाल्यास पोलिस पत्रकारांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत. पोलिस जशी गर्दी हाटवतात तशी पत्रकारांना बागणूक देऊ शकत नाहीत. पोलिस किंवा अधिकऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे काटजू म्हणाले, एखादा वकील आपल्या अशीलाला हात्येचा खटला न्यायालयात लढतो, तसा तो खुनी होत नाही, तसेच पत्रकार त्यांचे काम सार्वजनिक ठिकाणी करतात प्रत्येक गर्दीचा भाग नसतात, त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखणे हे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या संदर्भात प्रेस कौन्सिलने देशाने कैबिनेट सचिव गृहसचिव, मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि सर्व राजांच्या सचिवांना सूचना काढल्या असून पत्रकारांसोबत पोलिस, भूखंड माफिया, धन दांडगे अशा लोकांकडून पत्रकाराला जीवे मारणे, खंडणी मागितली म्हणून खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांच्यावर अत्याचार आता यापुढे केले तर संबंधितांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here