*कोळसा माफियांना अभयदान दिल्यामुळे आता चौकशीचे काय ? *न्यायालयात जामीन होण्यासाठी काय तर्क लावले असावे ? यांवर होणार चर्चा, *पोलिस प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लक्ष,
कोळसा चोरी प्रकरण!
चंद्रपूर प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील विविध कोळसा खाणीतून निघणारा लघुउद्योगांचा अल्पदरातील कोळसा खुल्या बाजारात चढ्या दराने विक्री सुरू असल्याच्या गंभीर प्रकरणात महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशनच्या
तक्रारीनंतर कैलास अग्रवाल यांच्यासह रोशन लाइम वर्क्सचे आसिफ रहेमान आणि नागपूरच्या प्राइड कोल अण्ड मिनरल्स प्रा. लि. चे शहजाद शेख यांचेवर ४२० सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते, आणि हे प्रकरण महाराष्ट्रातील कोळसा चोरी प्रकरणातील सर्वात मोठे प्रकरण असल्याने व यामधे आणखी काही कोळसा माफिया व राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याने या प्रकरणात किमान जिल्हा सत्र न्यायालयात जामीन होईल अशी शक्यता नव्हती, पण न्यायालयापुढे जामीन संदर्भात जे तर्क ठेवन्यात आले असेल ते दुबळे आणि आरोपींना मदतच करणारे असू शकते असे एक्सपर्ट चे म्हणने आहे. कारण जोपर्यंत एखद्या प्रकरणाची गांभीर्यता न्यायालयापुढे येत नाही तोपर्यन्त न्यायालय या संदर्भात जामीन नाकारत नाही त्यामुळे निश्चितपणे या प्रकरणात पाहिजे तो युक्तिवाद सरकारी वकिलातर्फे किंव्हा महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन नागपूरच्या वतीने न्यायालयात केला नसावा अशी शक्यता असली तरी पोलिस विभागावर न्यायालयाने ओढलेले ताशेरे नेमकी काय कहानी सांगतेय हे पाहणे सुद्धा महत्वाचे आहे. मात्र चंद्रपूर येथील जिल्हा न्यायाधीश (तिसरे) पी. जे. मोडक यांच्या न्यायालयाने बुधवारी आरोपी कैलास अग्रवाल आणि त्यांच्या सहकाऱ्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, यामागे न्यायालयाची भूमिका ही उपस्थित केलेल्या कागदपत्रांच्या वस्तुस्थितीवर असते त्यामुळे भक्कम असे पुरावे पोलिस प्रशासनाने न्यायालयात सादर केले नसावे असा सुद्धा तर्क दिल्या जात आहे, मात्र lयामुळे राष्ट्रीय संपलीची आशा प्रकारे चोरी करणाऱ्यावर पोलिस कारवाई करून फायदा तो काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोळसा चोरी प्रकरणातील लखन” तपासातून बाहेर?
चंद्रपुरातील कोळसा चोरी प्रकरणातील तीन आरोपींना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कोळशाच्या व्यवहारात महत्त्वाची भुमिका बजावणारा व चोरी घटनेनंतर तपास अधिकाऱ्यांपासून तर कोल इंडियाच्या अधिकारांना”manage” करणारा व कोळसा चोरीतील “मिडल पर्सन” लखन मात्र शेवट पर्यंत तपासाच्या चौकटीतून बाहेर कसा काय राहिला ? या चर्चेला आता उधाण आले आहे.
कोळसा चोरी ही कोल विभागाच्या अधिका-यांच्या संगनमताने सुद्धा होत आहे त्यामुळे या व्यवहारात हाच “लखन” महत्त्वाची भुमिका बजावतो, हे येथे उल्लेखनीय आहे.