Home राष्ट्रीय खतरनाक :- 20 एप्रिल ला मोदी सरकारचा R.B.I.संदर्भात एक मोठा निर्णय!

खतरनाक :- 20 एप्रिल ला मोदी सरकारचा R.B.I.संदर्भात एक मोठा निर्णय!

गंमत म्हणजे याबद्दल कोणत्याच मीडिया हाऊसने,चॅनेलने,वेब पोर्टल ने बातम्या दिलेल्या नाही याचे आश्चर्य !

भारतीय रिझर्व्ह बँकेची 20 तारखेची खालील प्रेसनोट आहे.ती त्यांच्या वेबसाईट अजून ही अव्हेलेबल आहे.या प्रेसनोट नुसार,”कोव्हीड 19 अर्थात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आता रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेण्याच्या नियमात संशोधन करून याआधी 75,000 करोड रुपये असणारी मर्यादा डायरेक्ट 2,00,000 करोड (2लाख करोड) रुपयांवर नेली आहे..!”

2019 च्या सुरुवातीलाही भारतीय रिझर्व्ह बँकेने 24.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.76 लाख कोटी रुपये लाभांश व अधिशेष भांडवल म्हणून मोदी सरकारकडे वर्ग केले होते.ही रक्कम 2018-19 सालच्या RBI च्या एकूण कमाईचा खूप मोठा हिस्सा होती.

इतकी मोठी बातमी.पण याबद्दल ना कोणत्या मीडिया चॅनेलवर चर्चा,ना कोणत्या पोर्टलवर बातमी.मराठी मीडिया पोर्टल तर एकदम भंकसच आहेत. त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाहीत.ही सगळी माध्यम आपल्याला या महत्वाच्या मुद्द्यावर आपलं लक्ष जाऊन नये म्हणून गुंतवून ठेवतायत.हिंदू मुस्लिम चा सिन उभा करून शेठच्या या कारनाम्यांना व्यवस्थित कव्हरिंग फायर देतायत…! आपन देखील या असल्या बातम्यांमध्ये गुंतून जातोय..!

इतकी मोठी खतरनाक बातमी जर मोदी शेठ मीडियात येण्यापासून रोखू शकत असेल तर एकूण एक मीडिया हाऊसचे खिसे गरम झाले असतील अस आपणास नक्कीच वाटू शकतं..! आणि अस असेल तर यांच्याएवढे देशद्रोही कोणीच असू शकत नाही हे ध्यानात घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here