Home वरोरा खळबळजनक :- वरोरा नगरपरिषदचे पाच माजी भाजप नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर ?

खळबळजनक :- वरोरा नगरपरिषदचे पाच माजी भाजप नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर ?

स्थानिक नेत्रुत्व नसल्याने नैराश्यापोटी घेणार निर्णय. राजकीय वर्तुळात खळबळ.

वरोरा प्रतिनिधी :

वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघात दिवंगत नेते संजय देवतळे यांच्या नंतर भाजपला स्थानिक नेता मिळाला नसल्याने भद्रावती नगरपरिषद मधील तीन नगरसेविका काँग्रेस मधे गेल्या तर आता वरोरा नगरपरिषद च्या पाच माजी भाजप नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश होतं असल्याची खळबळजनक बातमी विशेष सूत्रांकडून मिळाली असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप मधे जिथे इतर पक्षातील नेत्यांचा व नगरसेवकांचा प्रवेश करण्याचे सत्र सुरू असताना भाजप सोडण्याचा विचार त्या पाच नगरसेवकांना कां आला ? व ते पाच नगरसेवक कोण ? हे काही दिवसांतच समोर येणार आहे.

एकीकडे महाराष्ट्रात शिवसेनेला जय महाराष्ट्र करून तब्बल चाळीस आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्रात शिवसेना जणू संकटात असताना वरोरा शहारात मात्र शिवसेनेचा भाजप ला झटका बसण्याची दाट शक्यात निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. नुकतेच भाजपचे विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे त्या सुधीर मुनगंटीवार यांना कैबिनेट मंत्री पद मिळून त्यांच्याकडेच जिल्ह्याचे पालकमंत्री पद येणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या अर्थमंत्री म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळात वरोरा शहराच्या विकासासाठी मोठा निधी त्यांनी दिलेला होता, मात्र भाजपचे ते पाच नगरसेवक नेमक्या कुठल्या अपेक्षेने शिवसेनेत प्रवेश करत आहे तेच कळायला मार्ग नसून केवळ स्थानिक नेत्रुत्व नसल्याच्या कारणावरून ते पाच नगरसेवक भाजप सोडणार असेल तर भाजप च्या वरिष्ठांनी आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे एवढे मात्र खरे.

Previous articleहा कसला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव? जिथे महिलाचीच होते कुंचबना.
Next article“माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील” मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचे खणखणीत उत्तर. नितीन गडकरींना रात्री 12 वाजता फोन. मुंबई न्यूज नेटवर्क ;- राज्यातील रस्त्यांची दुर्दशा हा गंभीर प्रश्न असून मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी राज्यातील रस्त्यांच्या प्रश्नावर बोलताना सडकून टीका केली. “मी रात्री १२ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून मुंबई-गोवा महामार्गाकडे लक्ष द्या,” असं सांगितल्याचं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देतो असं नमूद करत आधी राज्यातील रस्ते सुधारायला हवे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत शर्मिला ठाकरे म्हणाल्या की “नितीन गडकरी घरी आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की वहिनी आजच तुमचं नाव भाषणात घेतलं. मी त्यांना रात्री १२ वाजता फोन करून मुंबई-गोवा रस्त्याकडे बघा, किती खड्डे आहेत, असं सांगितलं होतं. यानंतर नितीन गडकरी यांनी भाषणात माझा उल्लेख केला.” “आपल्याकडेच राजकारणी मुद्दाम चांगले रस्ते का करत नाहीत?” “माझं म्हणणं असं आहे महाराष्ट्र मागासलेलं राज्य नाही. महाराष्ट्र राज्याची सीमा कोणत्याही बाजूने सोडली तर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, हैदराबाद या सगळ्या ठिकाणी गुळगुळीत रस्ते दिसतात. आपल्याकडेच राजकारणी मुद्दाम चांगले रस्ते का करत नाहीत?” असा सवालही शर्मिला ठाकरेंनी केला. “महाराष्ट्र केंद्राला करातून सर्वाधिक पैसे देतो” शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या, “किमान रस्ते तरी नीट करा. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे झालीत, आता आपण ७५ वर्षे साजरी करत आहोत. महाराष्ट्र राज्य देशाला ४० ते ५० टक्के कर देतो. महाराष्ट्र केंद्राला करातून सर्वाधिक पैसे देतो, मग तुम्ही तुमचं राज्य तर नीट करा.” “माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील” “आपले रस्ते चांगले होतील अशी आपण इच्छ व्यक्त करुयात. काम करण्याची मानसिकता हवी. माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील, असं मला वाटतं,” असंही त्यांनी नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here