रवीकमल कॉटेस्कचे संचालक बबलू भाऊ चोरडिया यांचा स्तुत्य उपक्रम.
वरोरा प्रतिनिधी :-
एकीकडे अनेक व्यापारी हे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक शोषण करत असल्याची ओरड होत असताना वरोरा तालुक्यातील रवीकमल कॉटेस्कचे संचालक बबलू भाऊ चोरडिया यांचा शेतकऱ्यांना कमी किंमतीत शेती साहित्य उपलब्ध करून देणाचा स्तुत्य उपक्रम शेतकऱ्यांनासाठी वरदान ठरत आहे.
रवीकमल कॉटेस्कचे संचालक बबलू भाऊ चोरडिया हे दरवर्षी शेतकऱ्यांना लागणारी शेती सामुग्री मागील दोन ते तीन वर्षा पासून कमी किंमतीत उपलब्ध करून एक प्रकारे उपक्रम राबवीत आहे व शेतकऱ्यांना फायदा पोहचवून देणाचा प्रयत्न करीत आहे.खरं तर त्यांची ही भूमिका शेतातकऱ्यांना वरदान ठरत असून शेतकऱ्यांचा खरा मित्र असल्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.
शेतकऱ्यांना आपण कसा फायदा देऊ शकतो याबाबत सतत जागरूक असणारेचोराडिया यांनी या वर्षीसुद्धा अल्पसा दरात शेती उपयोगी बॅटरी चलित स्प्रे पंम्प वाटप केले आहे,याचा फायदा तालुक्यातील आजपर्यंत सहाशे शेतकऱ्यांनी घेतला असून पुढेhib अशीच शेतकरी हितांची कामे आपण चालू ठेऊ आणि शेतकऱ्यांना कसा फायदा देता येईल यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमाना त्यांनी दिली आहे.