सामाजिक कार्यातून महिलांनी साधली गावाची स्वच्छता. ग्रामीण वार्ता (धनराज बाटबरवे):-
ग्रामीण भागात संत गाडगेबाबा यांनी वेळोवेळी आपल्या किर्तनातून ग्राम स्वच्छता अभियानाची महती सांगितली परंतु तरीही आज त्यांच्या त्या स्वच्छता अभियानाची दखल ग्रामीण स्थरावर घेतल्या जातं असल्याचे चित्र दिसत नसतांना वरोरा तालुक्यातील मोवाडा गावांत मात्र महिलांनी पुढाकार घेऊन अख्खे गावांतील रस्ते झाडून काढल्याने त्या महिलांचे सर्वत्र कौतुक होतं आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाने बचत गट समूहांना प्रोत्साहन देऊन स्वतःच्या रोजगार निर्मिती साठी योजना राबवल्या व उमेद अंतर्गत विविध योजना राबवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा उपक्रम राबवला आहे आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान व इतर अभियानाअंतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.