माना समाजाचा सामाजिक शैक्षणिक वारसा आपण्याचा हा स्तुत्य उपक्रम समाजाला दिशा देणारा, मान्यवरांचे मनोगत.
वरोरा (धनराज बाटबरवे):-
तालुक्यातील माना समाजाचे युवा कार्यकर्ते विनोद खडसंग यांच्या पुढाकाराने नेहमीच समाजाच्या उत्कर्षांसाठी सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन होत असतें आणि त्या कार्यक्रमाना चांगला प्रतिसाद मिळत असतो असाच एक कार्यक्रम दिनांक दिनांक 15 जुन रोज रविवारला माना आदिम जमात मंडळ मुंबई तालुका शाखा वरोराच्या वतीने संत तुकडोजी विद्यालय तह कनिष्ट महाविद्यालय घेण्यात आला,
माना जमातीतील इयता १० वी व १२ वी मधून तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध शाळा महाविद्यालयातून प्रविण्याश्रेणी प्राप्त विद्यार्थांना तसेच आदिम समाजातील कला, किडा, साहित्य, कृषी व स्पर्धा परीक्षेतील उल्लेखनीय कामगिरी करणाच माना जमातीच्या व्यक्तीचा गुणगौरव व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुधाकर सोनवणे जे आ. ज. मं. मुंबई केद्रीय शाखेचे अध्यक्ष आहेत ते लाभले तर उद्घाटक म्हणून डॉ. रमेशकुमार गजभे माजी राज्यमंत्री (म.रा ) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. आ. ज. मं. मुंबई ची कार्यकारणी सदस्य अरविंद दडमल, श्रीकृष्ण नन्नावरे, भास्करराव गायकवाड, केशवराव बारेकर, विजय घरत, गुणवंत दडमल, हरिदास श्रीरामे उपस्थित होते. सदर कार्यक्रम एकूण ४५ गुणवंत, विद्यार्थी, समाजभूषण व्यक्तीचा गुणगौरव तथा सत्कार करण्यात आला . तालुका कार्यकारणी अध्यक्ष रामशोक दडमल, उपाध्यक्ष यशवंत घोडमारे तथा सदस्य गण दागेश श्रीरामे, प्रभाकर वाघ ,गुलाब श्रीरामे ,शंकर दडमल ,दादाजी दडमल ,सीमाताई घोडमारे , पार्ढोवताबाई ढोक .यांचे श्रेय लाभले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शिरिष दडमल यांनी केले तर आभार विनोद खडसंग यांनी मानले ग्रामीण विद्यार्थ्यांना क्रेदीय मंडळ मुंबई च्या सर्व मार्गदर्शक अतिथीचे मार्गदर्शन लाभले .