Home वरोरा मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा चंद्रपूर जिल्ह्याचा कार्यक्रम बदलला.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा चंद्रपूर जिल्ह्याचा कार्यक्रम बदलला.

पुढच्या वेळी वरोरा येथे आपल्या घरी नक्कीच येईल, राजसाहेबांनी राजूरकर यांना दिला शब्द.

वरोरा प्रतिनिधी :

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या कार्यक्रमात फेरबदल करण्यात आले असून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मनसेचे जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांच्या घरी दिनांक २० सप्टेंबरला दुपारी २.०० च्या दरम्यान येणार होते मात्र ऐन वेळेवर त्यांच्या दौऱ्याच्या वेळात बदल झाला असून आता राजसाहेब ठाकरे हे २० सप्टेंबरला पहाटे अमरावती कडे रवाना होणार आहे त्यामुळे वरोरा येथील राजूरकर यांच्या घरी होणारी सदिच्छा भेट होणार नसल्याची माहिती आहे. या संदर्भात राजूरकर हे स्वतः राजसाहेब ठाकरे यांच्याशी नागपूर येथे भेटले असता त्यांनी पुढच्या वेळी आपल्याकडे नक्की येईल असा शब्द दिला आहे.

मागील अनेक वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. जिल्ह्यात पक्षाची मोठी ताकत असली तरी त्यात एकवाक्यता नसल्याने ऐन निवडणुकीच्या वेळी पक्षाला पाहिजे त्याप्रमाणात यश मिळाले नाही मात्र आता वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मनसेला रमेश राजूरकर सारखा सक्षम व संयमी नेता मिळाला असल्याने व या क्षेत्रात सगळीकडे मनसेच्या शाखा बांधणी सुरू असल्याने वरोरा भद्रावती विधानसभेत मनसेचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. दरम्यान राजसाहेब ठाकरे यांची वरोरा येथे राजूरकर यांच्या घरी सदिच्छा भेट झाल्यास मोठा फायदा मनसेला मिळत होता व त्यामुळे पक्षाला बळकटी मिळाली असती परंतु अमरावती येथे कार्यक्रम उरकून राजसाहेब यांना मुंबई ला त्वरीत पोहचायचे असल्याने त्यांची वरोरा येथील भेट तुर्तास होणार नसल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here