Home Blog Page 207

उच्च शिक्षीत होऊन संघटीत व्हा – आमदार किशोर जोरगेवार

बिरसा क्रांती दलाच्या वतीने आदिवासी जनसंवाद परिषदेचे आयोजन

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर :-आदिवासी समाजाचा ईतिहास शुरवीर आहे. हा सेवेकरी समाज आहे. मात्र दुस-र्यांची सेवा करत असतांना आपण मागे राहिलो. आता याची चिंता व्यक्त करण्यापेक्षा यामागच्या कारणांचे अशा आयोजनाच्या माध्यमातुन चिंतन करा, उच्च शिक्षीत होऊन संघटीत व्हा आणि समाजाच्या न्यायक मागण्यांसाठी संघर्ष करा. यात लोकप्रतिनिधी म्हणुन शेवटच्या क्षणा पर्यंत मी आपल्या सोबत राहिल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

शहीद बाबुराव फुलेश्वर शेडमाके यांच्या जयंती निमित्त बिरसा क्रांती दलाच्या वतीने न्यू इंग्लीश शाळेच्या मैदानावर आदिवासी जनसंवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, माजी नगरसेवक नंदु नागरकर, बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, गिरीजा उईके, राजेंद्र मरस्कोल्हे, विष्णू कोवे, भूषण भुसे, अशोक उईके, साईराम मडावी, किरण कुंभरे, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, प्रदिप गेडाम, अतुल युनवते, रमेश भिसनकर, उत्तमराव मोडक, मारोती उईके आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, आदिवासी समाज हा या जिल्ह्याचा राजा आहे. हा जिल्हा तुमचा आहे. समाजातील युवकांमध्ये प्रतिभा आहे. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. समाजासाठी शासनाच्या असलेल्या योजना प्रत्येक घरी पोहचल्या पाहिजेत. याचा समाज बांधवांनीही लाभ घेतला पाहिजे. हा समाज शिक्षणाच्या बाबतीत मागे पडत चालला ही वस्तु स्थीती नाकारल्या जाऊ शकत नाही. याकडे समाजाने लक्ष दिले पाहिजे.

समाजातील अनेक प्रश्न प्रलंबीत आहे. याची मला कल्पना आहे. ज्या समस्या जिल्हा स्तरावर सूटतील त्या सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे. तर काही प्रश्न आपण शासन दरबारी मांडुन ते सोडविण्याच्या दिशेने पाठपुरावा करत आहोत. चंद्रपूरात जात पडताळणी केंद्र सुरु करण्याची मागणी आपण केली होती. याची दखल शासनाने घेतली असुन चंद्रपूरात जात पडताळणी कार्यालय मंजुर केले आहे. यासाठी आता जागा सुनिश्चीत केल्या जात असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. समाजाच्या अभ्यासीकेसाठी आपण मोठा निधी उपलब्ध करुन दिला असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले. समाजातील प्रश्न, समस्या या आमच्या प्रयत्न पोहचव्यात त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु असेही यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शिवाजी महाराजांचे स्मारक जटपुरा गेट येथेच व्हावे

दिपक बेले यांची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर :-चंद्रपूर शहरातील मुख्य मार्ग असलेले एकमेव ठिकाण जटपुरा गेट हे आहे जटपुरा गेट येथे मराठमोळा शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हणून शिवाजी महारारांचे स्मारक तयार करण्यात यावे अशी इच्छा व्यक्त दिपक बेले यांनी केलेली आहे,
यासाठी शासन प्रशासनाच्या पुढाकाराने व शरिरातील संपूर्ण शिवभक्त यांनी सर्वत्र एकत्र येऊन शिवाजी महाराज स्मारकासाठी मागणी करण्यात यावे ,दरवर्षी शिवजयंती निमित्ताने शिवभक्त मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती साजरी केली जातात आणि मोठं मोठ्या शहरात व ग्रामीण भागात शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळा उभारण्यात आले आहेत,परंतु चंद्रपूर शहरातच शूरवीर शिवाजी महाराजांचे स्मारक नसल्याने दीपक बेले यांनी दिलगीर व्यक्त केले आहे,
चंद्रपूर शहर हे राजकीय नेत्यांनी व श्रद्धाळू भक्तांनी भरकस पणे भरलेले आहे,आणि शिवजयंती उत्सव शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते परंतु शहरात कोठेही शिवाजी महाराजांचे स्मारक नसल्याने शिवभक्तासाठी लाजिरवाणी असलेली महत्वाची बाब आहे असे दीपक बेले यांनी म्हटले आहे,
म्हणून आता तरी शिवभक्तांनी समोर येऊन येणाऱ्या शिवजयंती पर्यंत जटपुरा गेट येथे शिवाजी महाराजांचे स्मारक तयार झालेच पाहिजे अशी मागणी दीपक बेले बेले यांनी केली आहे,

विशेष ;- मनसेच्या वर्धापन दिनी अनोखा सत्कार समारंभ

साहित्यिक, कलावंत व समाजसेवी यांच्या सत्काराने सामाजिक मन भारावलं.

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी माणसांसाठी लढणारी राजकीय संघटना असून मराठी कलावंत, मराठी साहित्यिक व समाजकार्यात वाहून घेतलेल्या लढवय्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते, त्यातच मनसेचा वर्धापन दिन असला की त्या निमित्याने अशा कर्तुत्ववान प्रभुतींचा गौरव पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केला जातो त्यामुळे तो वारसा जपण्यासाठी मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा येथील स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जेष्ठ साहित्यिक तथा झाडीबोली साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ना. गो. थुटे, श्रध्येय बाबा आमटे यांचे सहकारी व दोन्ही पायाने अपंग असताना अंध व अपंग कलावंत असणाऱ्या आर्केस्ट्राचे संयोजक सदाशिव ताजने व कोरोना काळात ज्यांनी शेकडो लोकांचे प्राण वाचवून अविरत सेवा दिली ते वरोरा येथील प्रख्यात डॉक्टर हेमंत खापने यांचा सत्कार करून जनसामान्यांच्या मानाचा वेध घेतला.

वरोरा येथे प्रख्यात साहित्यिक ज्यांची जवळपास ४९ पुस्तके प्रकाशित झाली व त्यांच्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीचा वेध घेणाऱ्या साहित्यिकांनी जवळपास त्यांवर १४ पुस्तके प्रकाशित केली तर एका व्यक्तीने त्यांच्या साहित्यावर पीएचडी केली असे जेष्ठ साहित्यिक व मराठी झाडीबोली साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ना. गो. थुटे यांचा सत्कार त्यांच्या कलासदन ग्रंथालयात करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना त्यांनी आपल्या घराचे नाव आविष्कार आहे आणि आविष्कार म्हणजे नवनिर्माण त्यामुळे आपल्या पक्षाला समर्पित नाव असल्याने आपल्या लोककल्याणकारी कामात माझा नेहमीच वाटा असेल असे आश्वासन व मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आशीर्वाद दिले.

पद्मश्री स्वर्गीय बाबा आमटे यांच्या सोबत व त्यानंतर सुद्धा आनंदवनात दोन्ही पाय नसताना आपली प्रचंड मेहनत आणि आपलं जीवन समर्पित करणारे व ज्यांना मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी भेट देऊन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला त्या आर्केस्ट्राचे कलावंत सदाशिव ताजने यांचा सत्कार त्यांच्या आनंदवन येथील घरी जावून मनसे पदाधिकाऱ्यांनी केला त्या सत्काराला भारावून जावून त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आशीर्वाद दिले व आपण जनतेच्या समस्या घेऊन लढा असे आवाहन केले.

मागील दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात जिथे वरोरा तालुक्यातील अनेक नामवंत डॉक्टर्स घरी बसले होते त्या कठीण काळात जनतेच्या सेवेत स्वतःला झोकुन देणारे प्रख्यात डॉक्टर हेमंत खापने यांचा सुद्धा मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या रुग्णालयात जावून केला.

मनसेच्या वर्धापन दिनी साहित्यिक, कलावंत व समाजसेवी विभुतींचा सत्कार करण्यात आला तो सत्कार खऱ्या अर्थाने सामाजिक द्रुष्टीने महत्वपूर्ण असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे अशी प्रतिक्रिया सत्कारमूर्तींनी दिली. यावेळी उपस्थित

सुधीर खापने महाराष्ट्र सैनिक, राजू कुकडे जिल्हा उपाध्यक्ष, विनोद सोनटक्के जिल्हा सचिव, रेवती इंगोले मनसे महिला तालुका अध्यक्ष, अनिता नकवे, शहर उपाध्यक्ष, प्रतीक मुडे प्रशीद्धी प्रमुख, प्रकाश धोपटे शहर विभाग अध्यक्ष इत्यादींची उपस्थिती होती.

गोंदिया जिल्हा महिला सचिव पदी ऍड, मेघा ठाकूर की नियुक्ति।

सामाजिक ,शैक्षणिक , तथा अन्याय के विरुद्ध लढा देनी वाली सर्व सामान्य लोगो की एकमेव स्वाभिमानी संघटना “सम्राट फाउंडेशन भारत”

संवाददाता चंद्रपूर

चंद्रपूर:- गोंदिया जिल्हा जागतिक महिला दिनी उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते ऍड,मेघा ठाकूर को महिला सम्मानचिन्न से सम्मानित करके मा, श्री,अंकित दादा राहंगडाले राष्ट्रीय अध्यक्ष सम्राट फाउंडेशन भारत और कोमल जी पटले सं,कोषाध्यक्ष महाराष्ट्र और संपूर्ण संघटन के पदाधिकारी इनके उपस्थिति में 8 मार्च 2023 को सम्राट फाउंडेशन भारत के कार्य 7 राज्य में समाजसेवा और कही युवा मित्र को साथ देने वाले सम्राट फाउंडेशन भारत संघटन के राष्ट्रीय अध्यक्ष और समिति ने *एडवोकेट मेघा ठाकुर * इनके सामाजिक कार्य ,कठिन परिश्रम और लोगो की सेवा करने को देखते इनकी नियुक्ति की गई और देश के शहीद हुए जवान को श्रद्धांजलि देकर *एडवोकेट मेघा ठाकुर* इन्हे कर्तव्य योद्धा बनाकर बधाई दी, सम्राट फाउंडेशन के पदाधिकारी ने वादा किया की हम हर गांव गांव में शाखा बनाकर गरीब जरूरतमंद ,मजदूर के साथ मरते दम तक साथ खड़े रहेंगे ,,,,

*जाहिर आवाहन ऍड, मेघा ठाकुर का किसान ,युवा ,माता बहनों को* ,
आप का हाथ मेरे हाथ में दीजिए मैं किसी के पैर पड़ने की जरूरत पड़ने नही दूंगी वचन देती हु,,,

मातोश्री वृदाआश्रमात महिला दिन साजरा करण्यात आला

जागतिक महिला दिन

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. 10 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांसोबत महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. सुचिता धांडे, वेकोली येथील सरिता मरुगेशन, डॉ. दिव्या मरुगेशन यांनी सामाजिक बांधिमातोश्री वृदाआश्रमात महिला दिवस साजरा करण्यात आला आपुलकी जपत वृध्दाश्रमातील वृध्द महिलांसोबत संवाद साधला.

यावेळी डॉ. धांडे म्हणाल्या, आज सामाजिक परिस्थिती बदलली आहे. कधीकाळी अनिच्छेने वृद्धाश्रमाची वाट धरणारे वृध्द आज वृद्धाश्रमाची वाट भरताना बघायला मिळते. येथे असणारे सर्व जण एकमेकांच्या सुख- दुःखात सहभागी असतात, असे त्यांनी सांगितले.

मनसेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बैलबंडी मोर्चा 15 मार्चला.

शिवजयंतीच्या दिवशी आयोजित मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं निर्णय.

वरोरा :-

जिल्ह्यात वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील जवळपास 1500 शेताकऱ्यांना प्रशासनाच्या चुकीमुळे कर्जमाफी पात्र असताना कर्जमाफी झाली नाही, जवळपास 2000 नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली 50 हजार प्रोत्साहन राशी मिळाली नाही तर 3 हजार शेताकऱ्यांना ओला दुष्काळ व अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी हवालदील झाला असून काही बैंक व्यवस्थापकांनी शेताकऱ्यांना नोटीस पाठवून कर्ज भरा अन्यथा तुमचे बैंक अकाउंट शील करू अशी धमकी दिली आहे तर काही शेतकऱ्यांची बैंक खाती शील सुद्धा करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आता आर्थिक व्यवहार करायचे कसे? हा प्रश्न त्यांच्यासमोर ठाकला आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशा पिडीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असून सध्या मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय व्हावा याकरिता शिवजयंती च्या दिवशी म्हणजे 10 मार्चला भव्य बैलबंडी मोर्चाचे आयोजन वरोरा तहसील कार्यालयावर करण्यात आले होते परंतु 10 मार्चला शिवजयंती निमित्य असणाऱ्या शोभा यात्रा व विविध कार्यक्रमाची रेलचेल बघता तुम्ही 10 तारखेनंतर मोर्चा घ्या अशी विनंती पोलीस प्रशासनाने मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्याने हा मोर्चा आता दिनांक 15 मार्च ला होणार आहे.

15 मार्चला होणाऱ्या या बैलबंडी मोर्च्यात मोठ्या संखेने शेतकरी व महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, शेतकऱ्यांचे नेत्रुत्व करणारे भदुजी गिरसाळवे, मनसेचे विशाल देठे, राम पाचभाई, प्रशांत बदकी, मोहित हिवरकर, अभिजीत पावडे, प्रणय लोणकर. संदीप मोरे, विनोद खडसंग,राजेंद्र धाबेकर, पंकज पेटकर, मनोज गाठले, पवन ढोके, जयंत चौधरी, पंकज पेटकर, धनराज वाटबरवे,शंकर क्षिरसागर, मनोहर खिरटकर अनिल दोमणे, अतुल गावंडे, दिलीप दोहतळे, अभय आसुटकर, प्रमोद हनवते, अशोक दाते, दिनेश जुमडे, शुभम नरड, संदीप धानोरकर, राजु पवार, प्रकाश धोपटे, विष्णू मुंजे, आसिफ शेख, अनिकेत गुजरकर, महिला सेना रेवती इंगोले, पोर्णिमा शेट्टी, शुभांगी मोहरे, अनिता नकवे, ज्योती मुंजे

लेकिंनो कष्ट करा, आत्मसन्मानाने जगा – गंगुबाई (अम्मा) जोरगेवार

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन, विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या महिलांचा सत्कार

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर आजचे युग महिलांचे आहे. परिवार सांभाळून स्वतःसाठी जगा. पूर्णत: इतरांवर अवलंबून न राहता महिलांनी आज परिवाराचा आर्थिक आधार बनण्याची गरज आहे. आजवर परिवार सांभाळण्यासाठी आपण कष्ट केले. आता आर्थिक सक्षम होण्यासाठी लेकिंनो कष्ट करा आणि आत्मसन्मानाने जगा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार यांनी केले.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, डॉ. रिमा निनावे, हिमांगीनी बिश्वास, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा जोशी आदी मान्यवरांची मंचावर मंचावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमात बोलताना गंगुबाई उर्फ अम्मा म्हणाल्या कि, आज मुलगा आमदार झाला असला तरी त्याने कष्ट करणे सोडले नाही. हीच आम्ही परिवाराला दिलेली शिकवण आहे. कारण कष्ट आणि प्रामाणिकता हाच यशाचा खरा मुलमंत्र असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. मुलगा निवडून आल्या नंतर माझ्या सांगण्यावरुन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अम्मा का टिफीन हा उपक्रम आम्ही सुरु केला. यातून दररोज आम्ही जवळपास 200 लोकांना जेवणाचा टिफीन घरपोच पाठवतो. फुटपाथ वर टोपल्या विकत परिवाराचा सांभाळ केला. पैसे कमी होते. मात्र संस्कार कधीही कमी पडू दिले नाही. बाल वयात मुलांवर तुमचे होत असलेले संस्कारच तुमचे आणि पर्यायाने तुमच्या परिवाराचे भविष्य ठरवतील असेही त्या यावेळी म्हणाल्या. माझ्या कार्याची समाज दखल घेईल असा कधीच विचार केला नव्हता. मात्र समाज जागृत आहे. त्यामुळेच आज या टोपल्या विकणाऱ्या अम्माचा वेगवेगळ्या संस्था सत्कार करतात. आज माझा मुलगा आमदार झाला म्हणून माझा सत्कार होतोय असे नाही. त्यांच्यावर जे संस्कार झाले त्यामुळे हे सत्कार आहे. असे मानणारी मी आहे. असेही त्या यावेळी म्हणाल्या.
या कार्यक्रमात आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळविणाऱ्या अनिता बोबडे, आयुर्वेदाचार्य तथा योग शिक्षिका ज्योती मसराम, नासा मध्ये जाण्याची संधी प्राप्त करणारी 10 कक्षाची विद्यार्थी निशिता खाडिलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मान्यवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत जागतिक महिला दिनाचे महत्व सांगितले. सदर कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दिन विशेष :-;वरोरा पोलीस स्टेशनमधे जागतिक महिला दिनी अनोखा उपक्रम.

महिला पोलीस उपनिरीक्षक बनल्या एक दिवशीय ठाणेदार तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांभाळले कार्यालयीन कामकाज.

वरोरा प्रतिनिधी :-

पोलीस प्रशासनात महिलांना फार मोठे स्थान नसते कारण महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची संख्या नगण्य असते पण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वरोरा पोलीस स्टेशन मधे या विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या संकल्पनेतून वरोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार काचोरे यांच्या ऐवजी महिला पोलीस उपनिरीक्षक तांदूळकर यांना ठाणेदार म्हणून कार्यभार सांभाळण्याची संधी देण्यात आली तर उर्वरित कार्यालयीन कामकाज बघण्याची प्रमुख जबाबदारी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली. या प्रसंगी घेतलेल्या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस अधीक्षक नोपानी यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचेसह पोलीस निरीक्षक अमोल काचारे, सहायक पोलीस निरीक्षक राजकीरन मडावी. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे. पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर पोलीस उपानिरीक्षक सचिन मुसळे, किशोर मित्तलवार व इतर महिला व पुरुष पोलीस कर्मचारी यांच्यासह मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, जेष्ठ पत्रकार प्रवीण खिरटकर, बाळू भोयर, राजेश मर्दाने, लखन केशवानी व इतर पत्रकार उपस्थित होते. महिलांना एक दिवस पोलीस स्टेशन मधे मानाचे स्थान देण्यात आल्याने या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला होता.
दरम्यान पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री – पुरुष विषमतेचे एक उदाहरण म्हणजे जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता आणि या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या.

१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये ‘क्लारा झेटकिन’ या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने ‘सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे’ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली.

८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून क्लाराने मांडलेला ठराव पास झाला.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया ‘बोलत्या’ व्हायला लागल्या.

ब्रेकिंग :- डॉ अशोक जिवतोडे यांच्या प्रस्तावित भाजप प्रवेशाने जिल्ह्यात खळबळ.

राष्ट्रवादीला रामराम तर भाजपला जय श्रीरामचा नारा, जिल्ह्यात भाजपाची ताकत वाढणार.

चंद्रपूर :-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य पदाधिकारी डॉ. अशोक जिवतोडे यांचा येणाऱ्या १४ मार्चपर्यंत भाजप प्रवेश निश्चित मनाला जातं असून त्यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान भाजप कडून ते लोकसभा लढवू शकतात किंव्हा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात ते भाजपचे विधानसभा निवडणुकीत उमेदवार सुद्धा राहू शकतात अशी चर्चा आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने भाजप ला ताकत मिळणार असून येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांची उपस्थिती भाजप ला मोठी उभारणी देऊ शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

डॉ. अशोक जिवतोडे हे मागील ३५ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात असून जनता महाविद्यालयात प्राध्यापक ते प्राचार्य असा त्यांचा शैक्षणिक प्रवास व निष्कलंक, चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व, अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाचे अध्यक्ष आहेत. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी अध्यक्ष तथा अधिष्ठाता, नामनियुक्त सदस्य, शिक्षण अभ्यासमंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाच्या प्राचार्य व प्राध्यापकांच्या संघटनेद्वारे होणाऱ्या कार्यात डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांचा सक्रिय सहभाग नेहमीच असतो. पूर्व विदर्भातील गोंडवन, आदिवासी, दुर्गम भागातील शैक्षणिक क्रांतीचे जनक शिक्षणमहर्षी स्व. श्रीहरी बळीराम जीवतोडे गुरुजींचे चिरंजीव तथा चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्हयात शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या विदर्भातील अग्रगण्य अशा नावाजलेल्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर या संस्थेचे मागील २७ वर्षापासून ते सचिव म्हणून प्रशंसनीय संघटन कार्य करत आलेले आहे.

डॉ अशोक जिवतोडे हे दरवर्षी संस्थेच्या व स्व. जीवतोडे गुरुजी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जिल्हाभरात आणि जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड, संवर्धन व रक्तदान शिबिरांच आयोजन करतात. वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेणाऱ्या इतर सामाजिक संघटनांना वृक्ष आणि बियाणांचा मोफत पुरवठा केला जातो. ग्रामीण भागात विशेषतः अतिदुर्गम भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन नियमित केले जाते. संस्थेअंतर्गत तसेच संस्थेबाहेर विविध क्षेत्रांतील व्यक्तींना प्रोत्साहन, विशेषतः संशोधन कार्य, साहित्य प्रकाशन, चित्रकला, रंगकर्मी, पत्रकारिता आदी समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन आणि सर्व प्रकारची मदत केली जाते. शेतकऱ्यांसाठी समाजप्रबोधन तथा अंधश्रद्धा निर्मूलन व विद्यार्थ्यांसाठी नैराश्यातून घडून येत असलेल्या आत्महत्या संदर्भात प्रबोधन करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे. त्यांच्या माध्यमातून व्यसनाधीनता व वाढत असलेली अंधश्रद्धा दूर व्हावी, म्हणूनच राष्ट्रीय कीर्तीचे विविध प्रबोधनकार, कीर्तनकार यांचे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून ५०,००० लोकांची उपस्थिती असते. अंधश्रद्धा निर्मूलनार्थ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष स्व. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि अन्य मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन त्यांनी आजवर केलेले आहे.

उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात घ्या

खासदार बाळू धानोरकर यांची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर : जिल्ह्यात दरवर्षी मार्च महिन्या पासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत, उन्हामुळे शाळा’सकाळच्या सत्रात घ्या..! उन्हाळ्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असतो. त्यामुळे सकाळच्या सत्रात इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी शिक्षण | विभागाकडे केली आहे. साधारणपणे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तापमान मोठ्याप्रमाणावर वाढलेले दिसते. या काळात अनेकदा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो. यंदा मात्र मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उष्णतेची लाट व त्याच्या परिणामांपासून करावयाचा बचाव याबाबत उपाय आवश्यक आहे. उष्णतेमुळे होणारा शारिरीक त्रास किरकोळ ते गंभीर स्वरुपाचा असू शकतो. किरकोळ त्रासाच्या स्वरुपात शरिरावर उष्णतेमुळे रॅशेश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा त्रास असतो. गंभीर प्रकारात उष्माघात होतो. यात व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. ही स्थिती लक्षात घेता इंग्रजी माध्यमातील शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.