Home Blog Page 273

महत्वाची बातमी:- विसलोनच्या रेल्वे गेटवरुन वाहतूक दोन दिवस बंद

 

रहदारी करणाऱ्या प्रवाशांनी गैरसोय होऊ नये म्हणून समजून घ्यावे रेल्वे विभागाचे आवाहन.

माजरी प्रतिनिधी (रवि भोगे)

माजरी–नागपुर ते चंद्रपूर दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी दि. १७ दुपारपासून शनिवारी सकाळपर्यंत एमरजेंसी कामामुळे वरोरा – भांदक या रेल्वे मार्गावर विसलोन गेट क्र.३१ वरुन वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वेमार्ग दुरुस्तीसाठी शुक्रवारी दुपारी चार ते शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत विसलोनच्या रेल्वे गेटवरुन वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

प्रवाशांची गैरसोय रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सकाळी अकरानंतर वाहतूक सुरळीत होणार आहे अशी सूचना रेल्वे प्रशासनाने दिली आहे. प्रवाश्यांनी यावेळेत या मार्गावरुन प्रवास करू नये असे आवाहन माजरीचे ठाणेदार विनित घागे यांनी केली आहे.

सनसनीखेज :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यांने उडाली खळबळ.

 

राज्यात सत्ता परिवर्तन होण्याचे संकेत की मी पुन्हा येईन चा तो जुना नारा? .

न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजपला नेहमी सत्ता स्थापनेचे झटके येत असतात कधी हे सरकार एका महिन्यात पडणार आहे तर कधी आठवड्या भरात हे पडणार म्हणून भाजप चे चंद्रकांत पाटील असो की मागच्या दराने खासदार झालेले व आता केंद्रीय मंत्री झालेले नारायण राणे असो या भाजपवाल्यांना सत्ता स्थापनेचा अट्टाहास काही केला कमी होत नाही अशातच आता भाजपचे राज्याचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुण्यातील गुरुवारी एका कार्यक्रमात उल्लेख माजी मंत्री म्हणून करण्यात आला तेंव्हा चंद्रकांत पाटील यांनी माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका, असे म्हटले होते त्यामुळे सर्वांच्याच भुवया चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे उंचावल्या आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सरकार येणार की दुसरा काही मोठा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा देखील रंगू लागली आहे.

चंद्रकात पाटील पुढे म्हणाले की मला माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल.अर्थात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत पाटील पुण्यातील देहूगाव येथे एका खासगी दुकानाच्या उद्घाटना प्रसंगी आले होते, तेव्हा त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. सूत्र संचालन करणाऱ्या व्यक्तीने उद्घाटन करण्याच्या अगोदर माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन होत असल्याचे म्हटले, तसेच वारंवार तसाच उल्लेख केला. त्यानंतर उद्घाटनासाठी रिबीन कापणार त्याच वेळी चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक वक्तव्य करत माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल असे म्हटले आहे.

चंद्रकात पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, त्यांनी केलेल्या सूचक वक्तव्याचा नेमका अर्थ काय आहे हे येणाऱ्या दोन-तीन दिवसात कळेल. तसेच विरोधक देखील त्यांच्या सूचक वक्तव्याकडे कसे पाहतात, हे देखील पाहावे लागणार आहे.

खळबळजनक :- चंद्रपूर जिल्हा परिषदमधे पुन्हा नौकरी लावून देण्याच्या नावाखाली युवतीची फसवणूक.

 

बल्लारपूर येथील ब्रिजेशकुमार बैधनाथ झा ह्या भामटय़ांनंतर पुन्हा काही भामटे यामधे सक्रिय?

चंद्रपूर प्रतिनिधी : –

चंद्रपूर जिल्हापरिषद मधे नौकरी लावून देतो म्हणून बल्लारपूर शहरातील काही बेरोजगार युवकांना लाखों रुपयांचा गंडा घालणाऱ्या बल्लारपूर शहरातील ब्रिजेशकुमार बैधनाथ झा यांच्या विरोधात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली शेठी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे यांनी रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार करून गुन्हा दाखल केला असल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली असतानाच आता पुन्हा एक भामटा जिल्हा परिषद आणि चंद्रपूर पंचायत समिती मधे नौकरी लाऊन देतो म्हणून एका युवतीकडुन चक्क २ लाख रुपये घेतल्याचा व आता तो भामटा फरार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

झा यांनी चंद्रपूर जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागातील वर्ग 3 च्या कर्मचारी व वर्ग ४ या पदाच्या जागा असल्याचा बनाव करून बल्लारपूर शहरातील बेरोजगार युवकांकडून लाखों रुपये घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरीचे नियुक्ती आदेश असलेले नियुक्ती पत्र दिले होते ते पत्र घेऊन सुशिक्षित बेरोजगार युवक जिल्हा परिषद आरोग्य विभागात गेले असता अशी कुठलीही नियुक्तीचे आदेशच निघाले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले तेंव्हा त्या बेरोजगार युवकांच्या पायाखालची जमीन सरकली होती व नंतर जिल्हा परिषद प्रशासनाला स्वतःहून पोलिसांकडे तक्रार दाखल करून त्या झा नावाच्या भामटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गोष्टीला अवघे ४८ तास उलटत नाही तोच आता दुसरा मामला समोर आला असून एका भामटय़ांनी बाबुपेठ येथील एका युवतीचे २ लाख रुपये नौकरी लावून देण्याच्या नावाखाली देऊन फसवणूक केली आहे.

आता या प्रकरणात संबंधित पीडित युवतीने त्या नौकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भामटय़ांचा मोबाईल जप्त करून तो शहर पोलीस स्टेशन मधे जमा केला होता व आज दिनांक १६ सप्टेंबरला शहर पोलीस स्टेशन मधे तक्रार दाखल केली असून आरोपींवर गुन्हा सुद्धा दाखल झाला असल्याची माहिती आहे. या जिल्हा परिषद मधे नौकरी लावून देण्याच्या घटना आता वाढायला लागल्या असून यामधे जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी यांचा हात असल्याचे व अनेक बेरोजगार यांची फसवणूक झाली असण्याची दाट शक्यता वाटत आहे त्यामुळे पोलिसांनी ही बाब गंभीरतेने घेऊन बेरोजगार युवकांना युवतींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.

हत्त्या झालेल्या वैष्णवी आंबटकर हिने पुर्वी दिलेल्या तक्रारीवर दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करा.

 

मनसेचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन.

चंद्रपूर प्रतिनिधी  :-

बाबुपेठ परिसरात राहणारी स्व. वैष्णवी उर्फ बनश्री अशोक आंबटकर हिचेवर प्रफुल्ल आत्राम (३४) यांनी गुरुवार दि. १ सप्टेंबर रोजी महाकाली मंदिर परिसरात एकतर्फी प्रेमातुन चाकुने हमला केला. या हमल्यानंतर १२ सप्टेंबर ला वैष्णवी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे प्रफुल्ल आत्राम यांच्याविरोधात बुधवार दि. १ ऑगस्ट रोजी पिडीत मुलीने आपल्या आईच्या उपस्थितीत रामनगर पोलिस स्टेशन मध्ये प्रफुल्ल आत्राम याच्या विरोधात माझी छेडछाड करीत असून माझ्या जिवाला प्रफुल्ल आत्राम याच्यापासून धोका असल्याची तक्रार दिली होती. पण रामनगरच्या पोलीसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला नाही किंव्हा त्याला साधी समज सुद्धा दिली नाही, कारण त्यावेळी जर आरोपीला पोलीस स्टेशन ला बोलावून त्याला दम भरला असता तर त्याची त्या मुलीवर जीवघेणा हल्ला करण्याची हिंमत झाली नसती त्यामुळे मयत वैष्णवी आंबटकरहिच्या मृत्यूला पोलीस प्रशासन तेवढेच जबाबदार असून मुलीच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणे आवश्यक आहे अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.

माझ्या विरोधात तक्रार का दिली याचा आकस घेऊन मुलगी व तिच्या आईने १ सप्टेंबर रोजी या गंभीर प्रकरणावर दिलेल्या तक्रारीनंतर वैष्णवी उर्फ वनश्री अशोक आंबटकर या मुलीवर ९ दिवसानंतर भर वस्तीमध्ये प्रफुल्ल आत्राम याने वैष्णवी हिचे वर चाकूने वार केला. रविवार दि. १२ सप्टेंबर रोजी वैष्णवी चा यामध्ये मृत्यू झाला. प्रफुल्ल आत्राम यांच्या विरोधात १ सप्टेंबर रोजी रामनगर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती, या तक्रारीची रामनगर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असती तर कदाचित वैष्णवी हिचा जिव वाचु शकला असता. ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणाचे वर्तन केले, त्याची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, तसेच आरोपी प्रफुल्ल आत्राम याला फाशीची शिक्षा देण्यासाठी सबळ पुरावे न्यायालयात सादर करावे, जेणेकरून दुसऱ्यांदा असे प्रकरण करताना कुठल्याही आरोपीला त्या शिक्षेची आठवण येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी मनविसे शहर उपाध्यक्ष पियुश धुपे, जिल्हा सचिव किशोर भाऊ मंडपूवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, राज वर्मा, वमशी रुद्रारपू, दुमदेव मरस्कोल्हे इत्यादींची उपस्थिती होती.

उपक्रम :- हरित मित्र परिवाराचे धनराज चाफले यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस

 

हरित क्रांतीचा संदेश असाच सुरू राहिल्यास वरोरा तालुका इतिहास घडवेल.

वरोरा प्रतिनिधी :-

आपल्या वाढदिवशी अनेक लोक केक कापून व मटण चिकन च्या पार्ट्या देतात प्रसंगी दारूच्या नशेत वाढदिवसाची रंगतदार पार्टी वेगळे वळण घेऊन कधी कधी संकटे निर्माण करतात पण हरित मित्र परिवाराचे किशोर ऊत्तरवार यांनी वरोरा तालुक्यात एक नवा पायंडा रचला असून तालुक्यातल्या अनेक मान्यवरांचे वाढदिवस हे चंदनाचे व इतर विविध प्रकारचे झाडे लावून किंव्हा ती झाडे भेट देवून आपला वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम चालवला आहे.

अशाचा प्रकारचा खूप सुंदर असा उपक्रम मागील 6 वर्षापासून चालू आहे, त्यांचे ब्रीद वाक्य असे आहे की सहयोगातून हरित क्रांतीकडे अर्थात हरित मित्र परिवार संयोजक किशोर उत्तरवार व त्यांचे मित्र धनराज चाफले यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती की धनराज यांनी आपल्या वाढदिवसानिमित्य इतरत्र खर्च न करता हरित मित्र परिवारातील सहयोगी मित्र परिवाराला सोबत घेऊन वरोरा हद्दीतील एकर्जुना ग्राम पंचायत पद्मालय नगर येथे दूतर्फी स्वखर्चाने काजू, रक्त चंदन, पेरू व लिंब ही झाडे लावावी आणि हा उपक्रम त्यांनी घेतला.

या वाढदिवसानिमित्य कार्यक्रमात सरपंच थेरे ताई तसेच ग्रामसेवक घुगल ताई व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे त्यांनी तोंडभरून कौतूक केले तसेच उपस्थित मित्रांनी सुद्धा आपाआपला वाढदिवस याच पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला या प्रसंगी लक्ष्मण चिंचोळकर, ठेंगेने, मडावी सर, बाळा पाचभाई, विलास चिकाटे, जयंत चंदनखेडे, गणपत किंहाके व मित्र परिवार उपस्थित होते

कोयला परिवहन मे स्थानिक लोगों को रोजगार देने कि मांग को लेकर मनसे कामगार सेना आक्रमक.

 

वेकोली वणी क्षेत्र के बेलोरा चेकपोस्ट मे मनसे के कामगार सेना जिल्हाध्यक्ष के नेत्रूत्वमे धरना प्रदर्शन आंदोलन.

घुग्घुस प्रतिनिधी :-

एक ओर जहाँ कोविड-19 व्हायरस के चलते देश में किये गये लॉक डाऊन की वजह से सभी स्तर के व्यापारी वर्ग हो सभी की आर्थिक मंदी से कमर टुट चुकी है. ये लॉकडाऊन करीबन दो वर्ष बीतने के बावजूद परिस्थिती सुधारी नही है ऐसेमे अब वेकोली कंपनी मे कोयला परिवहन करने वाले स्थानिक लोगोंकों भी आर्थिक मंदी की मार झेलनी पड रही है. मगर जब वेकोली कंपनी मे कोयला परिवहन के लिए स्थानिक लोगों को काम देने चाहिये तो ये कंपनियोंने बाहरी क्षेत्र से आए बडे ट्रांसपोर्ट कंपनी को काम कम रेट मे देकर वेकोली कंपनी स्थानिक लोगों के साथ दुर्व्यवहार करके आर्थिक शोषण कर रही है, अब इनके परीवार पर भुखे मरने कि नौबत आ गई है, वेकोली वणी क्षेत्र के कोयला खदान मे स्थानिक लोगों को काम न मिलनेसे और बाहरी बडे ट्रांसपोर्ट कंपनी को काम दिये गये वे स्थानिक लोगों को काम मे नही ले रही है इसलिये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना के जिलाध्यक्ष रविश शिंग इनके नेत्रूत्वमे और यंग चांदा बिग्रेड युनियन साथ मिलकर मनसे कामगार युनियन संलग्न सिंगल मोटर चालक मालक मिलकर वेकोली वणी क्षेत्र के बेलोरा चेकपोस्ट मे धरना प्रदर्शन आदोलन का आगाज कल तारीख 15 सप्टेंबर को किया गया.

वेकोली वणी क्षेत्र के नायगाव, मुगोंली, निलजई, उकणी, कोलारपिपरी, निलजई साऊथ, पैनगंगा, आदी जगह प्रबंधक अधिकारी को निवेदन देकर स्थानिक लोगों को रोजगार देने कि मांग कि है आनेवाले कुछ ही दिनों मे वेकोली कंपनी स्थानिक लोगों कि मांगे पुरी नही करती है तो मनसे कामगार युनियन संलग्न सिंगल मोटर चालक मिलकर चक्का जाम आदोलन के लिए चेतावनी वेकोली कंपनी को दी है.

यह आंदोलन मे मनसे कामगार सेना के जिल्हाध्यक्ष रविश सिंग, यंग चांदा बिग्रेड के सय्यद अबरार अहमद, मोहम्मद हनिफ, शानु सिदीकी, अनिल राम, राजु शेख, फिरोज शेख, सलीम शेख, राहुल रधुवंशी,दिलीप पांडे, सुनिल यादव, सुहैल शेख़, शाहरुख शेख, कलीम शेख, बबलु सिदीकी, मुन्ना शेख, आशीष गुडेटी, ताजु शेख, शैलेश गीरी, पिटु मंडल, अकबर अली, इब्राहीम खान, परवेज शेख आदी शैकडो मोटर चालक मालक संघटित होकर वेकोली प्रशासन के खिलाफ धरना प्रदर्शन किया

चिंताजनक :- महागाईच्या आगीत गरिबांचे जगणे झाले मुश्किल, अच्छे दिन च्या नावावर आले वाईट दिवस.

 

गँस घेणे परवडत नाही, राँकेल मिळत नाही आणि जंगली लाकडे तोडायला परवानगी नाही, मग जगायचं कसं?

खांबाडा मनोहर खिरडकर :-

केंद्र शासनाच्या उज्जला गैस योजनेच्या माध्यमातुन प्रत्येक गरिबांच्या घरात गँस आली खरी पण रेशन कार्डवर भेटणारे राँकेल मात्र बंद करण्यात आले त्यामुळे प्रत्येक घरात व छोट्या हाँटेलमध्ये वापरण्यात येणारे स्टो बंद झाले आणि वृक्षतोडीवर बंदी असल्याने चुली विझल्या आणि आता भरलेल्या सिलेंडर गँसचा दर सारखा आठवड्याला वाढत असल्याने व तो एक हजार रुपयापर्यंत पोहचत असल्याने सर्वसामान्य गोरगरीब माणसाचे जिने कठिन झाले आहे,

सध्या अनेक गाव राँकेलमुक्त झाले तथा सकाळी व संध्याकाळी निघणारा चुलीतला धुर कायमचा बंद झाला, ज्याच्याकडे गँस कनेक्शन अशा कुंटुंबाचा सुरु असणारा राँकेल पुरवठा यापुर्विच बंद करण्यात आला आणि गँसवर मिलणारी सबसिडी सुध्दा शासनाने बंद केली, त्यामूळे अशा कुंटुंबाकडे असलेल्या गँस व शेगड्या आता चालवायच्या कशा? या गंभीर प्रश्नात जनता आता हरवली असून आता सरपनाचे नवे साधन शोधून काढण्यास सुरुवात झाली आहे त्यात पालापाचोळा तथा दगडी कोळसा सरपण म्हणुन वापरण्यास सुरुवात झाल्याने चुलीवरचा स्वयंपाक सुरु झाला,
अगोदरच डिझेल व पेट्रोल दरवाढिने कित्येकाने आपल्या गाड्या विक्रीला काढल्या तर ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग बैलगाडीला पंसती देत पुन्हा जुने दिवस येतील का अशी चर्चा सुरू झाली पण लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने का बघत नाही? आणि जनतेच्या या गंभीर प्रश्नाला घेऊन रस्त्यांवर का उतरत नाही? याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

सावधान ! जिल्हा परिषद चंद्रपूर च्या आरोग्य विभागात बनावट पद भरती?

 

बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक, तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षऱ्यासह नियुक्ती पत्र.

चंद्रपूर प्रतिनिधी : –

सरकारी नौकरी लागावी म्हणून वाट्टेल ते करण्याची सुशिक्षित बेरोजगार युवकांची तयारी असते त्याच संधीचा फायदा उचलून काही भामटे हे सावज शोधतच असतात अशाच प्रकारची घटना चंद्रपूर जिल्हापरिषद मधे घडली असून बल्लारपूर शहरातील ब्रिजेशकुमार बैधनाथ झा याने बल्लारपूर शहरातील युवकांना जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात शासकीय नोकरी लावून देण्याचे आमीष दिले व नौकरी मिळणार या आशेने युवकांनी झा यांना लाखो रुपये सुद्धा दिले.

झा यांनी चंद्रपूर जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागातील वर्ग 3 च्या कर्मचारी व ४ या पदाचे तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरीचे नियुक्ती आदेश त्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना दिले.

आपल्याला शासकीय नोकरी मिळाली ती सुद्धा जिल्हा परिषद चंद्रपूरला याचा त्या युवकांना आनंद झाला मात्र तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जास्त काळ टिकणारा नव्हता. 9 सप्टेंबरला युवक नियुक्ती आदेश घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सेठी यांच्याकडे गेले असता सदर फसवणुकीची बाब उघडकीस आली.तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संगणकीकृत स्वाक्षरी चोरून हे आदेश तय करण्यात आले असल्याची माहिती समोर आली.

जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी झा याच्याविरुद्ध भादंवी ४६५, ४६८, ४७१ आणि ४२० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, नोकरीचे बनावट आदेश प्रकरणात आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून युवक-युवतींनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी केले आहे.

ओबीसी ला राजकीय आरक्षण संदर्भातील राज्य शासनाचा निर्णय असा झाला?

 

चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याचे आरक्षण जाणून घ्या.

न्यूज नेटवर्क मीडिया :-

महाराष्ट्रात राजकीय आरक्षण रद्द झाल्याने राज्य सरकारने नव्याने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे, मात्र मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

राज्यातील महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के आरक्षण ठेवून, ओबींसीसह एकूण मागासवर्गीय जागांपैकी एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांहून जास्त होणार नाही अशी सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय काल ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या अधिनियमात सुधारणा करण्याचा ग्राम विकास विभागाने प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने चर्चा होऊन मंत्रीमंडळाने खालीलप्रमाणे अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या अध्यादेशात करण्यात येणारी सुधारणा पुढीलप्रमाणे,

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 10, पोटकलम (2) चा खंड (ग) आणि कलम 30, पोटकलम (4) चा खंड (ब) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या कलम 12, पोटकलम (2) चा खंड (ग), कलम 42, पोटकलम (4)चा खंड (ब), कलम 58, पोटकलम (1ब) चा खंड (क) आणि कलम 67, पोटकलम (5) चा खंड (ब) मध्ये “नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के पर्यंत आरक्षण ठेवणे तसेच सदर आरक्षण ठेवताना एकूण मागासवर्गीय जागांपैकी अनुसूचित जाती + अनुसूचित जमाती + ओबीसीं (ना.मा.प्र.) चे एकत्रित आरक्षण ५० टक्के पेक्षा जास्त होणार नाही” अशी सुधारणा करण्यात येईल. हा सुधारित अध्यादेश ग्राम विकास विभागातर्फे काढण्यात येईल.या राज्य सरकारच्या निर्णयानंतर राज्यातील चंद्रपूर  सह जवळपास ८ जिल्ह्यात अनुसूचित जमाती ची संख्या लक्षात घेता ओबीसी समाजाला १९ टक्के आरक्षण मिळणार असल्याची माहिती आहे.

धक्कादायक :- राज्यातील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये 80 टक्के परप्रांतीय.

 

साकीनाका बलात्कार प्रकरणी मनसे आक्रमक. मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीयांची नोंद ठेवायचे दिले आदेश.

मुंबई न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात येणाऱ्या परप्रांतियांची माहिती ठेवावी अशी मागणी करत आहेत. मात्र, त्याकडे सत्ताधाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केले. पण आता साकीनाका घटनेनंतर राज्यकर्त्यांचे डोळे उघडल्याचे दिसत आहेत. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे राज्यातील परप्रांतीयांची नोंद होणार आहे. याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेला आदेश दिले आहेत.

खरं तर महाराष्ट्रात परप्रांतीय कोठून येतात? ते कोठे वास्तव करतात? याची कोणतीच माहिती पोलीस प्रशासनाकडे नसते. मात्र यासंबंधी पोलीस यंत्रणेकडे रेकॉर्ड असायला हवे अशी मागणी राजसाहेब ठाकरे यांनी सतत केली होती. कालांतराने तो मुद्दा बाजुला पडला. परंतू साकीनाका प्रकरणानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याने मनसेच्या त्या मागणीला विशेष महत्व होत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकीनाका बलात्कार प्रकरणी समजले असावे असे वाटत आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयावर भाजपने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. तर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सामाजिक तेढ पसरवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. परंतु आता राज्यात महिलांवर होणाऱ्या 80 टक्के अत्याचारामागे परप्रांतीय गुन्हेगार आहेत, असा दावा मनसेने केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतियांची नोंद ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्याचवेळी मनसेकडून हा दावा करण्यात आल्याने महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेला बळ मिळालं आहे. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी साकीनाका घटनेबाबत गृहमंत्र्यांना निवेदन देऊन पीडितेला लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे.